लिहायला सुचत नाही तेव्हा मी मलाच आठवत राहतो कोण आज माझं कोण परकं ते सारं मी आठवणींवर सोपवतो ! नको त्या विचारांची मशाल पेटते तेव्हा मी ही आसवं तिला स्वाधीन करतो थारा का द्यायचा अशा प्रकाशाला म्हणून मग, मी माझी सकारात्मकतेची भूमिकाही बजावतो ! पेन वही हातात मी घेतो तेव्हा शब्द ना शब्द ओठी तैनात असतो पण,खरंच लिहायला सुचत नाही तेव्हा मी तुफान येण्या अगोदरचा,स्तब्ध किनारा होतो ! सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा.. #लिहायलासुचतनाही हा विषय