आजही आठवतात दिवस ते बालपणाचे, कधीच न कुणाचे ऐकायचे जे मनात येईल तेच करायचे. झाली जरा जास्तच मनमानी तर घरचे ओरडायचे, मग रुसून बसलो कुठे की जरा जास्तच लाड व्हायचे. शाळेत जाताना ही खूप मस्ती चालायची, पुढे चालत असलेल्याच्या चपलीवर पाय देऊन मुद्दाम त्याची चप्पल तोडायची. एक आठवण तर बालपणाची माझे डोळे पाणावते, हरवू नये आपण बाजारात कुठे म्हणून वडिलांचे बोट धरायचे. मोठे होता आठवते ते सर्व अल्हडपण आणि खरंच वाटे पुन्हा यावे बालपण. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन. मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक्षणाबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरुंचा वाढदिवस बालक दिन म्हणून साजरा केला जातो. जवाहरलाल नेहरु यांच्या मते मुले देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत.देशाच्या उज्ज्वल भविष्यावर मुलांचे भवितव्य अवलंबून आहे हे त्यांना ठाऊक होते. चला तर मग आज बालक दिन यावर लिहुयात. #बालकदिन2019 #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.