#वाढत्या_अपेक्षांमुळे_उलटत_चालले_विवाहाचे_वय ! #चिंतेची_बाब शिक्षणाच्या वाढत्या सुविधांमुळे गेल्या पंधरा-वीस वर्षांत मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अगदी खेडेगावातही अनेक मुली पदवीपर्यंत व त्याही पुढे शिक्षण घेतलेल्या आहेत. शहरात हेच प्रमाण जास्त आहे. ह अभिमानाची बाब असली तरी या वाढलेल्या शिक्षणाने सर्वच समाजासमोर एक वेगळाच प्रश्न उभा राहिला आहे. मुली शिकल्या, त्यामुळे त्यांच्या अपेक्षाही वाढल्या, किमान आपल्यापेक्षा जास्त शिकलेला अन नोकरीवाला मुलगा असावा ही मुलींची अपेक्षा पूर्ण करणारे अनुरूप मुले मिळत नसल्याने मुलींचे विवाहाचे वय उलटत चालले आहे.