Find the Latest Status about आलेलं होतं नशिबात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आलेलं होतं नशिबात.
ganesh suryavanshi
जेव्हा ती व्यक्तीवर संकट येत नां त्या व्यक्तीला कोणीच समजून घेत नाही.. उलट तो समाजा समोर वाईट होऊन जातो.. किती पण जवळचं असेल तो व्यक्ती पण आपल्याला दोषी ठरवतो.. ©ganesh suryavanshi ऐकटं तर आलेलं संकटच करते.. #AkelaMann
गोरक्ष अशोक उंबरकर
प्रेम खरं असलं की मनातलं ओठावर येतं.. मन खरं असलं की ओठातलं शब्दावर येतं.. शब्द खरं असलं की शब्दरूप पानावर येत पानरुपी शब्दांच रूपांतर माझ्या कवितेत होतं.. मन लावून वाचलं की वाचलेलं हृदयात जातं... हृद्य चांगल असलं की कवितेला समजून घेतं.. समजून घेताना शब्दांना चांगला अर्थ देतं.. का कुणास ठाऊक हे सगळं आपसूक होतं... ©गोरक्ष अशोक उंबरकर सगळ आपसूक होतं..
कवी - के. गणेश
आयुष्याचं असं होतं.. वाहून गेलेल्या पाण्यासारखं वय कसं निघून जातं.. जगून घेईन म्हणत म्हणत आयुष्य किनाऱ्याला येतं.. चुरगाळलेल्या फुलासारख्या भावना विरून जातात.. मागे वळून पाहताना डोळेही भरून येतात.. ऋतुपरत्वे झाडाची पानं गळू लागतात.. ऊन वाऱ्याच्या झळा आपसूक कळू लागतात.. भूतकाळाकडं बोट करून रडताही येत नाही.. अन् चुकलेलं गणित खोडताही येत नाही.. पार शेवटच्या वळणावर जाणीव खोल होते.. जणू ओस माळरानात बहरायची सल राहते.. @kganesh ९०२८११०५०९ आयुष्याचं असं होतं..
कवी - के. गणेश
जीव असा गुंततो की डोकंही बधीर होतं.. तरल भावनांच्या पाई मनही अधीर होतं..! @kganesh मन अधीर होतं..
Sunil Zarikar
मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही पण तुला देवाकडे मागायला खूप आवडते... माहित नाही मला हक्क आहे कि नाही पण तुजी काळजी करायला खूप आवडते... तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित नाही पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते... कधी आपण सोबत असु किवा नसू पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते... तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही पण तुला माझी म्हणायला खूप आवडते... मनालाही समजावलय तू माझी नाही पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप आवडते... माहित नाही तु नशिबात आहेस की नाही..
Secret Quotes
प्रॆमात काही मर्यादा असतात अन त्या जर तुमच्या जवळच्या व्यक्ती ने तोडली तर त्या वेळेस होणाऱ्या त्रासा ला कोणी जाणवलं आहेत का...? त्या नंतर काय करायला हवं या वर कॊणी समजून घेताय का...? चूक समोरच्या जीवलगा ची नसते...? तिथे आपला विश्वास अन आपला प्रामाणिक पणा नडत असतो.. मग त्या व्यक्तीला त्याची शिक्षा देऊन काय अर्थ आपण चूक करतोय ना, जास्त विश्वास ठेवून,, तर ती शिक्षा स्वतःच घेतली पाहिजे निदान समोरच्या व्यक्तीला त्या चुकीची अन विश्वासाची जाणीव तर होईल... शेवटी जाता जाता...! नातं विश्वासच होतं शेवटी......