Nojoto: Largest Storytelling Platform

New मानेवर तीळ असणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मानेवर तीळ असणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मानेवर तीळ असणे.

Related Stories

    PopularLatestVideo

HANAMANT YADAV (कवीराज)

धम्माल लोकगीत विकणे आहे... तीळ तीळ काळजात.... #Music

read more
तीळ तीळ काळजात ....

आठवणीन तुझ्या गं राणी, मी फुटू  लागलो...
तीळ तीळ काळजात , तुटू लागलो...

पुनवची रात जशी,
चांदनीची बात जशी,
तुझ्या चेहर्यावरची हशी,
चातकावाणी राणी मी, टिपू लागलो...
तीळ तीळ काळजात , तुटू लागलो...

एकटाच मी रं देवा, एकांत खाई जीवा,
सोबतीला नाही कुणी,येशील तू गं कवा,

कंठी प्राण साठवून,
डोळ आसं जागवून,
सपान सोबतीच तुझ्या,
मी डोळी माझ्या , पाहू लागलो...
तीळ तीळ काळजात, तुटू लागलो....

कवीराज।
8698845253 धम्माल लोकगीत विकणे आहे...

तीळ तीळ काळजात....

Pratibha Ahire

तुझे असणे.... #मराठीविचार

read more
mute video

krunal.shwas@gmail.com

तीळ-गुळ #poem

read more
शोधात होतो ज्या तिळाच्या
तो तुझ्या ओठांवरच मिळाला
गरज नाही आहे गुळाची..😍
या तुझ्या ओठांवरच्या तिळाला



-✍🏻कृणाल कृष्णा सावंत.....(ऋणप्राजक्त)
मकर संक्रांतीच्या गुलाबी शुभेच्छा तीळ-गुळ

Vin's Bansode

#असणे साधे काय होते #poem

read more
तुझे उत्तर तयार आहे
माझा प्रश्न अजून नाही

शब्दाला सार्थ अर्थ आहे
बेअर्थ प्रश्न माझा नाही

सरता वेळ किती जातो
परतीचा वेळ येत नाही

अधोरेखित करून ठेवले सारे
महत्वाचे काही उरले नाही

शब्दांना कैक लावून दिले
एक नि दोन राहिले नाही

द्वंद्व उमटून फिकट झाला
तुला आता तो दिसणार नाही

कुठल्या विश्वात तू आहे
मला जाण अजून नाही


@kavi_graj #असणे साधे काय होते

Deepak Badade

तुझे असणे..😍😍 #marathi #आठवण #DeePraj

read more
तुझ्या समोर नसण्यापेक्षा, 
गोड जुन्या आठवणीत असणे जास्त त्रास देते .. तुझे असणे..😍😍
#marathi #आठवण #DeePraj

aaj_ki_peshkash

mute video

Spidey2411

तीळ गूळ घ्या आणि मागून गोड बोला 🙏 #मराठीसंस्कृति

read more
mute video

Ravi patil

#tereliyeजिभेवर तीळ......https://app.justmoreservices.com/html/down/frenzywinner.html?aff_sub1=84d364a8881399f8.. #मराठीप्रेम

read more
शाळेच्या मैदानावर राजू आणि चिंटूची चांगलीच जमली.राजूने क्रिकेट खेळताखेळता चिंटूला भरमसाठशिव्या दिल्या.आणि तुझा बाप मरेल असा घणाघाती शापही दिला.तुम्हाला वाटेल शाप फक्त महाभारात ,रामायणातच होते कि काय,आजच्या युगात आधुनिक भारतातही शाप आहेत आणि ते लागूही पडतात.





राजूच्या जिभेवर म्हणे तीळ आहे .तो जे बोलतो ते खरे होते.बाकी काही खरे होऊदे अथवा न होऊदे ,पण जेव्हा राजू संतापाने कोणाला तुझा बाप मरेल असा शाप देतो त्यावेळी मात्र सारेच टरकतात.कारण दुस-या दिवशी बाप वर रवाना झालेला असतो.अशी अनेक उदाहरणे घडल्यामुळे मैदानावर सुरु असलेला क्रिकेटचा डाव अचानक थांबला.फिल्डर जागच्याजागी उभे राहिले.कारण राजूने चिंटुला संतापाने शाप दिला होता.क्रिकेटची इनिंग तेथेच संपली .जो तो आपल्या घरी गेला आणि दुस-या दिवशी चिंटुच्या बाबांची इनिंग संपली होती.

मैदानावरची हि घटना शाळेत कुणीतरी वर्गशिक्षक तुकाराम शिंदे यांना सांगितली.तुकाराम शिंदे भडक डोक्याचे त्यांनी राजूला स्टंपने बदडला.राजु रडरड रडला.संतापाच्या भरात तो ओरडला 'सर मला मारताय तुमचा बाप मरेल .' संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी गेलेले शिंदे सर दुस-या दिवशी गावी निघून गेले.सांगलीवरून वडील वारल्याचा फोन आल्याची बातमी शाळेत पसरली आणि शाळेला एक दिवसाची सुट्टी मिळाल्यांने मुले आनंदाने घरी निघून गेली.


१५ दिवसांनी शाळेत परतलेल्या शिंदे सरांनी सर्व इतिहास मुख्याध्यापक रघुवीर पवार यांना सांगितला.पवारांनी राजूच्या वडीलांना निरोप पाठवला,मुलाच्या कर्तृत्वाचे पाढे त्यांनी राजूचे वडील शंकरराव यांच्या पुढे वाचले.'असे अनेक प्रकार आपल्या मुलाच्या बाबतीत घडले आहेत यापुढे लक्ष्य ठेवा' अशी तंबी राजूच्या वडीलांना मुख्याध्यापकांनी दिली.कुठूनतरी राजूच्या कानावर ही बातमी गेली.त्यानी या रघुवीर मास्तरचा म्हातारा मरतो कि नाही बघ अशी वल्गना वर्गात केली.आणि दुस-या दिवशी रघुवीर पवार यांचे वडील कैलासवासी झाले.


यथावकाश राजूचा दाखला शाळेतून काढून त्याच्या घरी पाठवण्यात आला.राजूचा मोठा भाऊप्रविण शाळेत गेला त्यांनी मुख्याध्यापकांना भरपूर समजावले कुणीही ऐकले नाही.कारण राजूचा अनुभव शाळा, गाव ,मित्र सर्वांनाच आला होता.अनेकांनी हे कार्ट मरत का नाही ?असे जाहीर प्रकटनही केले होते. राजुचे नाव अखेर शाळेतून काढण्यात आले.या प्रकारामुळे राजुचा भाऊखूप संतापला.त्यांनी घरामध्ये राजुला बेदम बदडले.राजूमुळे सर्वांना मनस्ताप सहन कारावा लागला होता याची चिड मारा्तांन त्याच्या मनात होती.मार खाऊन सुजलेला राजू कोप-यातून हळूच बोलला 'दादा मला मारतोस तुझा पण बाप मरेल. झालं.....सत्यानाश...राजूच्या या वाक्याने प्रविणच्या हातातली काठी खाली पडली.राजूचे बाबा शंकरराव धाडकन खुर्चीत बसले.आईने थेट हुंदकाच दिला.आणि घरात सर्वत्र नीरव शांतता पसरली.आपले बाबा मरणार या कल्पनेने प्रविणला वाईट वाटले.आपण जाणार या भावनेतून शंकरराव खुर्चीत विमनस्क बसले होते.रात्री घरी कोणीही जेवले नाही.पाण्याचा थेंबही पोटात गेला नाही.राजूची आत्तापर्यंतची भविष्यवाणी खरी ठरली होती.त्यामुळे सर्व कुटुंब चिंतेत होते.शंकरराव सारखे आपल्या छातीला हात लावून स्वत:ला तपासून पाहात होते.पंखा पडून मरायला होईल या भितीने ते पंख्यापासून दूर जाऊन बसले.रात्रीच दोन वाजले तरी शंकररावांना झोप नाही.घरात मोठा लाईट लावून ठेवलेला होता. छातीत धडधड सुरु होती.


पहाटे पहाटे राजूचे बाबा शंकरराव यांना डोळा लागला.


तेवढ्यात राजूची आई त्यांना उठवू लागली.


' अहो उठा, झोपलात काय ? शेजारचे गणपतराव मेले.



©Ravi patil #tereliyeजिभेवर तीळ......https://app.justmoreservices.com/html/down/frenzywinner.html?aff_sub1=84d364a8881399f8..

sneha

पैसा आणि प्रेमाचं संतुलन असणे खूप गरजेचं आहे आयुष्यात. #nojotto

read more
.



प्रत्येक नात्यांमध्ये दोनही गोष्टी खूप 
महत्वाच्या असतात पैसा आणि प्रेम,
पैसा नसेल तर जगणं अशक्य असते,
आणि पैसा खूप असेल आणि प्रेमच
नसेल तर ते नात टिकनही अवघड
            असते म्हणून दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या
आहे पैसा आणि प्रेम.

©sneha पैसा आणि प्रेमाचं संतुलन असणे खूप
गरजेचं आहे आयुष्यात.
#nojotto

dsp motivation

स्वीकारभाव असणे फार महत्वाचे आहे त्यामुळे मनाची अवस्था त्वरित बदलते. #Quote

read more
स्वीकारभाव असणे फार महत्वाचे आहे त्यामुळे मनाची अवस्था त्वरित बदलते. स्वीकारभाव असणे फार महत्वाचे आहे त्यामुळे मनाची अवस्था त्वरित बदलते.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile