Find the Latest Status about भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले.
राजेंद्रभोसले
देशासाठी न्यात अज्ञात किती भक्त क्रांती कुंडात झोकून अमर किती झालेll ध्रु ll नाही गिणती युवकांचीनारी शक्ती सेवकांची धर्मांधांनी टाकला डावव्यापाऱ्यांनी रचला काव करुनी पुढला विचारदेव मानसाचा प्रचार.ll१ll ब्रिटिशांचे व्यापारीपणसत्तेसाठी विकेद्रीकरण सर्व बनले गुलामी प्रिय पर्व रचले सेवक प्रिय तत्वाची उभारून फौजप्रस्थपितांनी केली मौज ll २ll क्रांतीची बीजे न्यारी मायभू साठी झाली प्यारी काही नाटकी धर्मांध पोरकातडी बचाव शिरजोर स्वातंत्र्याचे बनले पाईकसोवल्यातले नाईक ll ३ll स्वातंत्र्य
milind sarkate
बंधनाच्या अंधकारात तु स्वातंत्र्य गमावलस.. पत ,पैसा, प्रतिष्ठाचा नादात आयुष्याला गुलाम बनवलस स्वातंत्र्य
Mahesh Lokhande
स्वातंत्र्य भारताचे स्वातंत्र्य भारताचे होवो चिरायु सदा फडकत तिरंगा हा राहो नभी सदा जन्मास महापुरूष येवोत पुन्हा पुन्हा कोण्या भारतवीराचा ना होवो कधी गुन्हा भारतीय संस्कृतीचा ना होवो अवमान स्वपराक्रमाने ठेवु त्याची उंच सदा मान आठवु त्याग शौर्य आठवु दिव्य क्रांती समता एकता बंधुता साठवु मनी शांती भेदभाव भ्रष्टाचार जावो मनातून जात वंदनीय भारत होवो सार्या सदा विश्वात कवी-महेश लोखंडे स्वातंत्र्य भारताचे
Amol Jadhav
डर क्या है कुछ नही मेरे पास खोने का ना तो गर्व है मुझे शौक से जिने का. मुझे तो बस गर्व है। हिंदूस्तानी होने का. . जय भारत.. स्वातंत्र्य दिवस
Sarita Sawant
डोक्यावर पदर म्हणजे बाई राखते सन्मान पडलाच चुकून खाली की झालाच अवमान डोक्यावर पदर म्हणजे ती शालीन नाहीच घेतला तर ती झालीच असंस्कारी डोक्यावर पदर म्हणजे जपली संस्कृती नाहीतर खाल्लीच तिने माती डोक्यावर पदर,खाली मान शोभली पाहिजे ती संस्कारी बाहुली फुटलाच कंठ तिला की झाली संस्कारांची पायमल्ली सारला पदर बाजूला, पाऊल टाकले उंबराठ्याबाहेर की मिळालीच धुळीला इज्जत डोक्यावरचा पदर सावरून सावरते संसार ती विचारा तिलाही कधीतरी काय हवंय तुला बाई मोकळ्या आभाळाशिवाय काही मागायची नाही ती मिळुद्या पदरावीण मुक्ती तिलाही जखडून ठेवलेल्या रुढीत जखडत तिच अस्तित्व घेउद्या जरा मोकळा श्वास तिला जगुद्या तिचा तिला स्वाभिमान झुकवणार नाही ती तुमची मान. #स्त्री #स्वातंत्र्य #मराठीकविता
gauri kulkarni
कधी कधी मी मांडते जुन्या आठवणींचा पसारा हरवते काही क्षण मिरवते काही क्षण कधी कधी उलगडतो पट अलवार जपलेल्या नात्यांचा गुंत्यात गुंतते नकळत मन सापडतात मग सोनेरी पान कधी कधी झेपत नाही अपेक्षांचं ओझं लुटुपुटूच्या भांडणात होतंच की तुझं-माझं अश्रूंचा बांध फुटला की आवरता आवरत नाही अन् अबोल्यातुन काही सावरता सावरत नाही कधी कधी मात्र आकाश निरभ्र असतं स्वच्छशा मनाच्या तळाशी प्रेमच साठलेलं दिसतं हळुवार हातांनी तू त्या प्रेमाला कुरूवाळतोस स्पर्शाच्या भाषेतून सगळं दुःख विरघळून टाकतोस कधी कधी भेटतो आपण अनोळखी होऊन अन् वळणावरून चालताना जातो एकमेकांत हरवून तुझं माझं अस्तित्व आता वेगळं उरत नाही सुखं दुःख वाटून घेताना आयुष्य आपल्याला पुरत नाही #कधी कधी