खरतर अबोला तेव्हा पूर्णत्वास जातो जेव्हा त्या व्यक्तीविषयी विचार एकदा तुमच्या मनाला शिवत नाही..इथे विचारांच द्वंद्व संपत नाही, आठवणी स्वस्थ बसू देत नाही, नेमकं काय सिद्ध करायचं हे कळत नाही..तरी अबोल्याच गोंडस नाव देऊन । जीवघेणी स्पर्धा टिकून राहते..अश्यावेळी अबोला असूनही तो जिंकत नाही जिंकत ते । नात..एकमेकांविषयी असलेली ओढ जितकी लपवाल तेवढा त्रास वाढत जातो..अशा वेळी एकत्र अश्रूंचा पाऊस व्हावा, भावनांचा निचरा करावा, नाहीतर स्वाभिमान, अहंकार सोडून, सरळ व्यक्त व्हाव..सोपं दोन्ही ही नाही..पण मनाची अनिश्चित अवस्था बाहेरून जितकी सहज तेवढी आतून जीवघेणी..दुसऱ्याला ही तितकाच त्रास होतोय या जाणिवेची सजीव भावना जिवंत राहिली की नाती अमर होतात..