"सासरवाशीन पोरीं वाणी ,माझ्या, या कविता रंगमंचावर कधी, बागडल्याच नाही. नट्टा पट्टा करून, विरमल्या होत्या लेकी माझ्या, पण आरशांच्या काचा कधी, सापडल्याच नाही. पेन, कागद ,आणि मी, एवढीच त्यांची दुनिया, व्यक्त होण्यासाठी या, कधी नडल्याच नाही भावनेचा आत्मा ,शब्दांचा देह, घेऊन अवतरल्या तरी का? त्या कधी, घडल्याच नाही (क्रमश:) माझ्या कविता