शांतता... मुंग्याचेही लोंढे आले अन् निरव शांतता भंगून गेली... गावाकडची निरव शांतता धगाधगीत दबून राहिली... पिंपात मेले ओल्या उंदिर माना पडल्या, मुरगळल्याविण.. भंगून गेली निरव शांतता जगणे झाले, उदासविण... गिऱ्हाइकाची कदर राखणे; एवढेच माझ्या हाती उरले... सुख शांतीच्या शोधात माझे जीवन सगळे आता सरले... लाभे ना कधी निरव शांतता की ढिल्या गळा पंचम गहिरा... आठवून मग तो गाव माझा गात्रावरती या निघे शहारा... सुन्न झाले मन, सुन्न भावना लाभली ना कधी रे शांतता.. अस्थाईवर स्थाईक झाल्याशी लाभेल एकदाची चिर निद्रिता.... *''''''''''''''''''''अजित*