काही वेळा पर्याय नसतो पण शांत राहाव लागत. अनेक अडचणी ,प्रश्न आपल्या समोर येऊन उभे राहतात मन अस्वस्थ होत प्रचंड राग येतो स्वतःवर चीड येते पण तरीही शांत रहाण्यातच हीत असत आपण अनेक वेळा पटकन रागावतो भावनेच्या आहारी जाऊन नको ते निर्णय घेतो आणि मग नंतर अजुन रागावतो पण ज्या व्यक्तीला शांत राहता येत ना तो खरा सामर्थ्यवान प्रयोग करून बघा आणि स्वतः अनुभव घ्या आपण स्वतः शांत राहिल्याने कुठ्ल्याही परिस्थितीला आपल्याला हरवता येत आणि आपण विजयी होतो.कारण ह्या जीवनात अनेक प्रसंग येणार आहेत जे आपली परीक्षा घेणार आहेत मग त्यासाठी आपण तयार असलेले केंव्हाही चांगल.जॉब मनासारखा नाही की चिडचिड पगार नाही चिडचिड लग्न होत नाही हे घ्यायचंय ते घ्यायचंय चीडचीड असं करून नाही चालणार कुठेतरी तडजोड करत हसत हसत पुढेजावं लागत हाच खरा जीवन मंत्र आहे.📚✍️sandy✍️