#DearZindagi प्लास्टिक वापर बंदी ही सर्वांच्या हिताचा निर्णय आहे. प्लास्टिक हाताळायला आणि वापरा साठी सोपं होतं हे मान्य , परंतु त्याचे दुष्परिणाम हे शेती, सर्व प्रकारचे प्राणी आणि निसर्गावर दिसून येतो आणि त्याचा भयंकर परिणाम देखील आपण बघतो. प्लास्टिक बंद झाले तर शेतकऱ्याच्या शेतातील कापसाला अजून मागणी वाढेल कारण कापडी पिशव्या लागतील, नैसर्गिक संपत्ती तुन निर्माण होणाऱ्या पत्रावळ्या , डोने इत्यादी ची देखील मागणी होईल पर्यायाने ह्या वस्तू निर्माण करण्या साठी तरुण शेतकरी उद्योजक निर्माण होतील, त्यांना उगीच कुणासमोर हाथ पसरवायची गरज पडणार नाही कारण जमीन उपलब्ध आहे त्यात फक्त त्यांना तश्या झाडांची लागवड करावी लागेल. प्लास्टिक बंदी मुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल, जनावर सुखी राहतील, आणि याच मुळे पुढील पिढी निरोगी राहील. लोकांना सवय लागेल लवकर त्यात शंका नाही प्लास्टिक बंदी हटऊ नये ती कायम ठेवावी...🙏🇮🇳🇮🇳