प्रत्येक वेळी आपण माणसाच्या वागण्यात, विचारात, कामात चुका काढत असतो. त्यांच्यावर टीका करत फिरतो. उगाचच त्यांच्या नावावर चुकीचा आणि फालतूंच लेबल चिकटवत असतो. परंतु त्यांच्या अशा वागण्यामागे काहीतरी कारण नक्कीच असेल हे आपण विसरतो. तरी, आपण त्यांच्याबद्दल पुरेपूर शहानिशा न करता, त्यांच्याविषयी कसलं पण विचार करत असतो. आणि चुकीचं ठरवत असतो. हे आपलं चुकतं ना? (प्रीत )