मातीच्या वेदनेचा अस्सल ऐवज म्हणजे रावसाहेब कुवर यांची कविता.त्यांचा " हरवलेल्या आवाजाची फिर्याद" हा ताकदीचा कविता संग्रह काव्याग्रह प्रकाशनाने प्रकाशित केला.साक्री सारख्या ग्रामीण भागात ग्रामसेवक म्हणून काम करताना रावसाहेबांसारखा कवी जसा कवितेशी प्रामाणिक आहे तसा शेती मातीत काम करणाऱ्या गोरगरिबाच्या सुख दु:खाशी एकरूप आहे.म्हणून त्यांची कविता व्यथेला हळुवार कुरवाळते.मनातलं सांगताना बहुआयामी होते.नाती-गोती, शेती,सामाजिक स्थित्यंतरं याचा ती नेमका वेध घेते. रावसाहेब कुवर माणुस म्हणूनही खुप गोड आहेत. #nojotophoto