फिर्याद आलास स्वागत आहे फक्त एक तेवढं कर जिथं गरज तिथं नक्की बरस आर्थिक दरी आहेच समाजात तू मात्र इथं तिथं पाठ फिरवून त्या दरीची सरी नको देऊस आसुसलेल्या डोळ्यांसोबत वाहा आल्यासारखा चार दिवस पाहुणा म्हणून राहा अति करशील तर कसलेली माती होईल स्वाहा तेव्हा थोडं दमानं पाहुणचार घे अन सुखावून जा पाहूणा म्हणल्यावर जरासा भाव खाशील नाही तिथं नाही तेव्हा टपकशील हवाहवासा सहवास तुझा नकोसा करून टाकशील बेतानं बरस नाही तर आला म्हणून आणि नाही आला म्हणून पण दूषणं घेशील तुझ्या वाटेला डोळा लावणाऱ्या डोळ्यात तुझ्यामुळं वरुण देवा कधी कोरडा दुष्काळ कधी महापूर सारी तुझीच लेकरं नको असा काढू कसूर तुझा तूच हळहळशील बापावाणी, मायेपरी हुरहूर किमान तुझ्या आशेवर जगणाऱ्याला, ह्या शेतकऱ्याला लाल चिखलातनं, भरलेल्या डबक्यातनं वाट दिसू दे असा बरस सर्वार्थानं, समाधानाचं हसू दे ओलाव्याची ऊब, तुझ्या मायेची कूस दे झिम्माड नभाला, चिंब मनाला सूखासु दे "#सरकार दरबारी फिर्याद करून काही होईल असं वाटत नाही म्हणून वरुणराजाकडं #फिर्याद केलेली बरी, किमान तो तरी ऐकेल" #rayofhope #rainofhope #shetkari #unevenrain #naturalcalamities #farmerslife #struggle #paus #firyaad 🙏👏👏😔 #rayofhope #rain #farmers #Nature #God #unwantedrain #paus #firyaad ⛈🌨👏😔