आठवणी.. फार विचित्र असतात ना ?? आठवणींचं असं वेळीअवेळी येणे.. कधी सुखद अनुभूती देणे तर कधी नकळत आसवे गाळणे.. कधी कधी वाटतं आठवणी उगाच येतात छळायला.. तर कधी कधी असंही वाटतं की आठवणी हव्यात हळुवार पाळायला.. कोणत्याही पाहुणचाराची अभिलाषा न बाळगता किंवा कोणत्याही अपमानाची तमा न बाळगता आठवणी निरंतर येत राहतात सुख दुःखाचे हिंदोळे नित्यनेमे त्या घेत राहतात.. आठवणी नकळत घेऊन जातात वर्तमानातून भूतकाळात तसेच भूतकाळातून भविष्यात.. क्षण येतात आणि क्षण जातात आठवणी मात्र निरंतर सावलीसम सोबत असतात.. ©शब्दवेडा किशोर #आठवणींच्यापुस्तकातुन #आठवणींच्या_साठवणी