बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी अंजनवेलला जाण्याचा योग जुळून आला.सात ते आठ तासांचा प्रवास जवळपास अकरा तासांचा झाला.दोन वेळा फेरीबोटचा प्रवास केला.मज्जाच मज्जा आली.वातावरण जरा ढगाळ होतं. आभाळ नि समुद्र पांढऱ्या रंगात एकरूप झालं होतं.फोटोमध्ये समजतच नव्हतं आभाळ कुठलं आणि समुद्र कुठला.
संध्याकाळी पाच साडेपाचला पोचलो एकदाचे अंजनवेलला.मामाच्या घराच्या अगदी समोर समुद्र आहे, पाहिलं तर ओहोटी. झाडाचं पानही हलत नव्हतं.वानरं मात्र या आंब्याच्या झाडावरून त्या आंब्याच्या झाडावर तुटून पडली होती. प्रथमदर्शनी मला