हार्दिक अभिनंदन गणगोत प्रकाशनाचं हे पहिलं पुस्तक.ताकतीचा ग्रामीण कथा संग्रह.नांदेडचे लेखक सु.द.घाटे यांच्या कथा मनस्वी आवडल्या.शीर्षक रुमणपेच असल्यानं काय चित्र काढावं हा पेच होताच. कथेचा नेमका धागा धरून हा पेच सोडवला. हा पेच म्हणजे एक पारंपारिक गाठ आहे जी सुटतही नाही आणि तुटतही नाही.आपलेपणाच्या,तुटत गेलेल्या नात्याविषयी,गणगोताविषयी व परिस्थितीशी दोन हात करताना वाट्याला येणाऱ्या संघर्षाविषयी लेखक नेमकं भाष्य करतो. प्रकाशनाच्या या पहिल्या वहिल्या पुस्तकाचं मुखपृष्ठ करायचं भाग्य लाभलं हा आनंद.या कथासंग्रहास नुकताच औरंगाबाद येथील कै. सावित्रीबाई वा.जोशी स्मृती पुरस्कार जाहीर झाला त्या बद्दल लेखक आणि प्रकाशक दोघांचे अभिनंदन !💐