जीवन हे पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे असते, शांत नितळ पाण्यात पोहून अपेक्षित किनारी पोहोचणे तशी सहज साध्य गोष्ट. पण सातत्याने संघर्ष करून चढ उतार भेदत प्रवाहाच्या विरुद्ध जाणाऱ्या व्यक्ती कालांतराने प्रचंड कणखर सामर्थ्यशाली बनतात. कारण पैलतीरी मार्गस्थ होताना त्यांचा हा अनोखा-अगम्य प्रवास जणू त्यांच्या आयुष्याला एक नवनिर्मितीचा परिसस्पर्श करून वेगळीच झळाळी प्राप्त करून गेलेला असतो... ©कविता पुराणिक विचारधारा