असा शब्द जो सर्वांनाच नकोसा आहे , पण तरीही तो जीवनातील महत्वपूर्ण अंग आहे . त्यापासून सर्वांनाच दुर रहावेसे वाटते पण कदाचितच ते शक्य आहे . सर्वांना हीच भिती असते की जर " अपयश आले तर काय करु ? " , त्यामुळे तर काही जन कुठलाही प्रयत्न न करता स्वताला कमी लेखतात पण हा केवळ मुर्खपणाच आहे बाकी काही ही नाही . जसे अज्ञान्याचा काळोख्याला ज्ञानाच्या प्रकाशाने दुर केल्या जाऊ शकते , अशांततेला शांततेने , द्वेषाला प्रेमाने तसेच अपयशाला न घाबरता खंबीरपणे उभे राहून त्यावर पूरक मार्ग काढणे केव्हाही चांगले . जसा सूर्य रोज सकाळी उगवतो व सायंकाळी मावळतो त्याच प्रमाणे आपले जीवन पण विविध रंगांतुन व्यतीत होते . कधी दुःखांचा डोंगर तर कधी आनंदाच्या लाटा कुणाचेच जीवन जन्मताच सोयीस्कर नसते संकटे , यश , अपयश हे तर सर्वांनाच येतील पण संघर्ष करून जिद्दीने त्यावर मात करून विजय मिळविने हेच आपण किती परिपक्व आहो याचे प्रमाण . सुप्रभात ताई आणि दादानों💕 आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे. अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा. #अपयश #अपयश1 #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai