Nojoto: Largest Storytelling Platform

विचारी क्षण रात्रीचा पडदा दूर सारत सूर्यदेव रोज न

विचारी क्षण 
रात्रीचा पडदा दूर सारत सूर्यदेव रोज नव्याने पृथ्वीवर येतात. 
कधी कधी ढगांच्या आड लपत हळूच गायब होतात.  आयुष्यही असंच असतं आशेच्या ढगांवर नकळत पडणारी निराशेची सावली. आशा निराशेचा खेळ रोजचाच अगदी छोट्या छोट्या गोष्टी मनासारख्या नाही झाल्या तर आपण निराश होतो चिडचिड करतो.  मग त्या चिडचिडीने आपला आणि पर्यायाने आपल्या जवळच्या लोकांचा दिवस खराब होऊ शकतो. आता कुणी म्हणेल काम बिघडणं कुठे आपल्या हातात असतं? बरोबर आहे आपल्या हातात नसतंच काम बिघडणं पण बिघडलेल्या कामाला सुधारणं तर असतं. दोन सेकंद थांबून जरा श्वास घेऊन विचार केला तर उत्तरही सापडतच. गरज असते ती स्वतःला वेळ देण्याची आपण काही शर्यतीत नाही आहोत. आणि असलो तरी आयुष्याची शर्यत सगळ्यात मोठी असते. ती जिंकण्यासाठी आधी आपण तर टिकायला हवं. म्हणूनच चिडचिड होत असताना थोडंसं थांबून स्वतःला विचारायचं की इतकी धावपळ इतका त्रागा आत्ता या क्षणी करण्याची गरज आहे का? उत्तर स्वतःकडूनच मिळेल आणि योग्य मिळेल. 
      आयुष्य भरभरून जगण्यासाठी फक्त थोडं निवांत विचार करण्याची गरज आहे बास. हे जर जमलं तर आपलं आणि आपल्या जवळच्या सगळ्यांचंच आयुष्य खूप बदलेल. अवघड असेल कदाचित पण अशक्य नाही. पटलं तर ट्राय करा. 
प्रत्येकाला आज एक तरी निवांत असा विचारी क्षण लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!!
 #विचारी क्षण
विचारी क्षण 
रात्रीचा पडदा दूर सारत सूर्यदेव रोज नव्याने पृथ्वीवर येतात. 
कधी कधी ढगांच्या आड लपत हळूच गायब होतात.  आयुष्यही असंच असतं आशेच्या ढगांवर नकळत पडणारी निराशेची सावली. आशा निराशेचा खेळ रोजचाच अगदी छोट्या छोट्या गोष्टी मनासारख्या नाही झाल्या तर आपण निराश होतो चिडचिड करतो.  मग त्या चिडचिडीने आपला आणि पर्यायाने आपल्या जवळच्या लोकांचा दिवस खराब होऊ शकतो. आता कुणी म्हणेल काम बिघडणं कुठे आपल्या हातात असतं? बरोबर आहे आपल्या हातात नसतंच काम बिघडणं पण बिघडलेल्या कामाला सुधारणं तर असतं. दोन सेकंद थांबून जरा श्वास घेऊन विचार केला तर उत्तरही सापडतच. गरज असते ती स्वतःला वेळ देण्याची आपण काही शर्यतीत नाही आहोत. आणि असलो तरी आयुष्याची शर्यत सगळ्यात मोठी असते. ती जिंकण्यासाठी आधी आपण तर टिकायला हवं. म्हणूनच चिडचिड होत असताना थोडंसं थांबून स्वतःला विचारायचं की इतकी धावपळ इतका त्रागा आत्ता या क्षणी करण्याची गरज आहे का? उत्तर स्वतःकडूनच मिळेल आणि योग्य मिळेल. 
      आयुष्य भरभरून जगण्यासाठी फक्त थोडं निवांत विचार करण्याची गरज आहे बास. हे जर जमलं तर आपलं आणि आपल्या जवळच्या सगळ्यांचंच आयुष्य खूप बदलेल. अवघड असेल कदाचित पण अशक्य नाही. पटलं तर ट्राय करा. 
प्रत्येकाला आज एक तरी निवांत असा विचारी क्षण लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!!
 #विचारी क्षण