देवा आधीच त्रास होता डोळ्यातल्या पावसाचा आता पूर घेत आहे दरमानसी प्राण दिवसाचा ती मायमाऊली बिचारी पाण्यात पोर शोधत बसली सोड रे गैरसमज सगळे बस तूच एक पोर नवसाचा आधीच गावात सगळा आठवणींचा सागर होता मग का आखला तू आणखी बेत पूरपावसाचा तुझ्याचसाठी सगळे त्यांचे वारीउपवास होते मग उगाच का झाला तू शिरजोर माणसाचा मानले ही मी तू गरजेला कधी पाऊस देत नसतो पण शेतीच मारणारा कसला अत्याचार पावसाचा सोड सोडनारे आता तुझे जीवघेणे हट्ट सगळे दे आवाज संकटांना अन कर विचार पावसाचा - गोविंद अनिल पोलाड ( विद्रोही कवी विचारमंच )