बऱ्याच दिवसांनी काल मैत्रिणीकडे गेले होते.आमच्या गप्पा सुरु झाल्या , गप्पांच्या ओघात माझं लक्ष तिच्या घरी असलेल्या त्या पिंजऱ्यातल्या पोपटाकडे गेलं.मला क्षणभर त्या पोपटाची दया आली कुणालाही येईल.तो पिंजरा म्हणजेच त्याचं आयुष्य जणू बनलं होतं. का कोण जाणे मलाही बरेचदा आपण स्वतः त्या पिंजऱ्यातलं आयुष्य जगतोय असं वाटतं. सहजपणे कुणीतरी मनाला टाचणी टोचावी इतपत बोलून जातं तेव्हा ढसाढसा रडावंस वाटतं परंतु रडलं की तुम्ही मानसिकदृष्ट्या किती कमकुवत हे समजतात लोक.मग काय ? रडायचं नाही. मला अजूनही समजलं ना