पुन्हा आठवतात तेच दिवस एकटा पडलेला असताना कुणी अनेक वचने देऊन मला अर्ध्यात सोडलं असताना.. सुरुवात खूप असते गोड मग कडवी वाट दिसताना हजारो नाती अर्ध्यात तोडून दहा च नाती शेवटपर्यंत पुढे जाताना.. नात्यांमधले ते क्षण विसरून अर्ध्यात हात सोडताना पुन्हा आले तेच अनुभव प्रेमाच्या वाटेवर चालताना.. खूप कमी असतात नाती निभावणारे बाकी बघितलं टाइमपास करताना स्वार्थी जगातलं प्रेम हल्ली बघत असतो रोज तुटताना.. हल्ली काय वचने काय नाते तुटतात स्वार्थ शोधताना वाटलं नव्हतं पण पुन्हा तसंच झालं बघितलं सगळेच बदलताना.. ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #kavita #SAD #marathi