माझे मत -- माझे विचार मित्रांनो, आपल्या देशात नुकतीच चांद्रमोहीम राबविली गेली. भारतीय वैज्ञानिकांचे अभिनंदन.सदरची मोहीम चंद्रावर पाणी शोधण्यासाठी आहे. खरे पाहता, अमेरिका,जापान,... या बलाढ्य राष्ट्राप्रमाणे आपल्या देशाला हे परवडणारे नाही.आपल्या देशात नियोजनाअभावी पृथ्वीवरील पाणी अद्याप पावेतो सांभाळता आलेले नाही आणि आपण करोडो रुपये खर्चून पाणी शोधावयास निघालो आहे. समजा चंद्रावर पाणी सापडले तर ते पाणी आयात करण्यासाठी आपल्याला चंद्र ते भारत ( पाकिस्तान,.. वगैरेंची नाहरकत घेवून) एवढी पाईप लाईन टाकावी लागेल. हा देशाचा विकास कि विनाश हे आपण ठरवा.अॅड.के.एम.सूर्यवंशी