आमचा आजचा धर्म हा मुळीं धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारें एक पाजी थोतांड आहे. या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटेतर दुनिया माणूस असून पशूपेक्षांही पशू बनली आहे. त्यामुळें आमच्या सर्वांगीण हलाकीचें मूळ भटांच्या पोटांत आहे. त्यांच्या गोडबोल्या ओठांत नव्हे; हे शेंकडा दहा लोकांना पटतां पटतांच एक शतक काळाच्या उदरांत गडप झालें. भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडांत देवळांचा नंबर पहिला लागतो.
―प्रबोधन ठाकरे
(देवळांचा धर्म आणि धर्मीची देवळे)
देवळे पृ2