#आईचा_बालदिन आज मैत्रिणींच्या ग्रुपमधे बालदिन साजरा करण्याची धामधुम सुरु होती. कोणीतरी विचारले,"आपला काय प्रोग्राम ठरवायचा ग मुलींनो..." मुलांना घेऊन बालदिनाचे काय सिलिब्रेशन करायचे ह्याची चर्चा सुरु होती. राजश्री लगेच म्हणाली,"सध्या सगळ्याच गोष्टींचे प्रमाण किती वाढलेय नाही.मुलांना आनंदी ठेवण्यासाठी काय काय नवनवीन दिवस साजरे केले जात आहेत ना..." प्रेमाला तिचे बोलणे नाही आवडले.ती पटकन म्हणाली,"तुमची गोष्ट वेगळी आहे ग...आम्ही दिवसभर जाँबला जातो त्यामुळे आम्हाला मुलांना वेळ देता येत नाही ह्याची कुठेतरी खंत असते.मग मुलांना आनंद देण्यासाठी अशी संधी सोडावी वाटत नाही..."