पत्रास कारण की... तु नसताना आयुष्यात माझ्या, तुझी येते दिवस रात्र आठवण मला, शब्द होतात मग भाव मनीचे, त्यातुनच उमटतात मग भावना, समोर असतो कोरा कागद, हातात असते लेखणी, मनातल्या भावना करून गोळा, उतरवते मग लेखणीतून साऱ्या. शुभ संध्या मित्रहो आज जागतिक टपाल दिवस.. आताचा विषय आहे. पत्रास कारण की.. #पत्रासकारणकी चला तर मग लिहुया. प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्क करण्यासाठी पत्र पाठविण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे.