आज ३ एप्रिल.... आजच्याच दिवशी रायगडावर सूर्य मावळला तो कायमचा... हिंदवी स्वराज्याचा सूर्य....!! अठरापगड जाती-जमाती व बारा मावळातील पोर सोर एकत्र करून स्वतःच्या राज्याची अवघड संकल्पना ज्यांनी सत्यात उतरवली.... तो सूर्य मावळला....!! पाच-पाच शत्रूंशी एकाच वेळी लढून देखील स्वराज्य ज्यांनी शाबूत ठेवले.... तो सूर्य मावळला...!! आपली ताकद कमी असेल तर शत्रूशी लढताना गनिमी कावा वापरावा, हि शक्ती ज्यांनी जगाला दिली.... तो सूर्य मावळला...! हिंदू धर्माचे रक्षण करून देव-देवतांचे अस्तित्व ज्यांनी अबाधित ठेवले.... तो सूर्य मावळला...! जिवंतपणी ज्यांना देवाची उपाधी मिळाली, ज्यांची तुलना त्यांच्या शिवाय आणखी कोणाशीही होऊ शकत नाही.... तो सूर्य मावळला...तो सूर्य मावळला...!! मात्र...मात्र, तो सूर्य मावळताना देखील आमच्या सारख्या सह्याद्री च्या पाखरांच्या असंख्य मनात ज्योत पेटवून गेला...!! मावळलेला सूर्य आजही मावळ्यांच्या मनात तेवत आहे...तेव्हड्याच प्रखरतेने...!! (मावळा तेजस अभिमान जाधव) आजच्या दिवशी लेखनातून शिवरायांना मानाचा मुजरा..!!