कल्पनेतलं जग खूप सुंदर असतं, आपल्याला हवं तसं, निवांत क्षणी, झोपेत, स्वप्नात, आनंदाने विहार करतो आपण. अगदीच एखादी गोष्ट नाही पटली, तर भानावर येऊन, जागे होऊन, ते नकोसं चित्र पुसून टाकतो आणि नवं चित्र रेखाटायला पुन्हा डोळे मिटून घेतो. प्रत्यक्षात मात्र तसं नसतं..लहान मुलं त्या कल्पनेच्या जगात जागेपणीही वावरतात..पण मोठं झाल्यावर नाही तसं करता येत. म्हणून लोक नशेच्या आहारी जात असावेत का? जागेपणी त्या स्वप्नातल्या जगात वावरायला?...शैलेश हिंदळेकर