कविता: साहित्याचा बाण ;माझा अण्णा भाऊ लोकांचे लोकशाहीर ते अवघ्या जगाचा साहित्यकार होऊनी गेले.... मुंबईची पायवाट ते काट्याकुट्यात तुडवीत गेले.....! निर्दयी शिक्षका पायी शाळा सोडली असताना ही मुंबईत कुटुंबाच्या उदरनिर्वाहातही अक्षरांची पाऊल खुणा मांडीत गेले......! शब्द शब्द जोडुनी संग्रह करून सुशिक्षितालाही लाजवत गेले...! काय त्यांची महिमा थोर गरीब असूनही गरीबाच्याच झुंझार लेखनिस आपले साहित्य अर्पण केले.... ! महाराष्ट्रात नाही तर जगभरात आपले नाव कोरुनी गेले.....! आला काळ तो महिमेचा आणि अक्षरांचा शब्दही मुका होत गेला.....! १८ जुलै ला साहित्याचा खाणच आम्हा सोडुनी गेला.....! कवयित्री:कु:अनिषा दिलीप दोडके ©Anisha Dodke अण्णा भाऊ साठे #BookLife