नात्यांच्या गोडव्यातून, मित्रांच्या सहवासातून, सुखाच्या क्षणातून, प्रेमाच्या बंधातून, मी नेहमी वगळलेला. यशाच्या शिखरातून, किर्तीच्या मोहातून, शौर्याच्या गाथांतून, स्वप्नांच्या दुनियेतून, मी नेहमी वगळलेला. जन सागराच्या गर्दीतून, मी माझाच माझ्यातून, मृत्यूच्या दारातून, आणि जीवनाच्या वाटेतून ही मी नेहमीच वगळलेला... आपल्या आयुष्यात येणाऱ्या कित्येक लोकांना आपण कळत - नकळत 'वगळत' असतो.स्वत:ला कधी त्यांच्या जागी ठेऊन विचारच करत नाही. त्यांच्या मनात भानांचे काय कल्लोळ निर्माण होत असतील? ना त्यांच्याशी कुणी बोलणारा असतो ना कुणी विचारणारा, ते व्यक्त तरी कुणा पुढे होनार? त्यावरच आधारित आहे ही कविता " मी नेहमीच वगळलेला..." #मी_नेहमीच_वगळलेला #quotesofnikesh #yqmarathi #marathikavita YourQuote Taai #yqbaba