मला हेच वाटतंय कधीकधी, आजपर्यंत जे माझ्या मनात दडलं आहे, ते कुणालातरी सांगावं, माझ्या काळजातलं सगळं गाळ उपसून काढावं, जड झालेलं हे मन हलकं करावं, वाहून जावू द्यावं सगळं भळाभळा मनाच्या बाहेर, पण, कोणाला सांगावं? कोण माझ्या भावना समजून घेईल? भेटेल काय कुणी ज्याच्याजवळ खरंच वाटेल की, हे आपलं मन हलकं करावं, खरच वाटतेय कधीकधी मनातलं सगळं सांगून टाकावं... आणि मोकळं व्हावं ह्या गर्दीतून.. (प्रीत )