एकटा बरा मी फिरतोच फार आहे नासुर पावलांना काट्याचा मार आहे मी काय सांगू त्या दुःखाची कहाणी आठवणी जिवंत सगळ्या स्वप्ने ठार आहे माझ्याच सरणाला चार माणसांची चिंता शेवटी मिळेल तेतूके जगण्याचा सार आहे बोचली ही दुनिया आजन्म आलो जेव्हा जाण्यास बंद सगळे परतीचे दार आहे रंगमंची नाटकांचे जरी नगमे गायीले मी आयुष्यातल्या स्वरांचा शेवटी विचार आहे किम्मत सरली जरीही दिलात आप्तीकांच्या जगण्यात संघर्ष माझ्या हिम्मतीत धार आहे - गोविंद अनिल पोलाड मो:-८०८०१६६०११