ना ओंजळ भर पानी, नाही सरकारची वाणी याच्या अंगणात नेहमीच दुःखाच्या सरी.. ना असते पूरी चादर यांच्या मुला मुलीला.. तो बाशिंदा युगाचा,जगाच्या भुकेचा... का करू देता आत्महत्या त्या शेतकर्याला ...... हसतो निसर्ग या त्याच्या मरमरीला..... असतो मनात तांडव त्याच्या या काळजीला...... कष्टाच्या घामाने भिजवतो तो मातीला..... तरी ही मिळत नाही जरीचि साडी त्याच्या बाशिंदीला... का करू देता आत्महत्या त्या शेतकर्याला ...... डोळ्याच्या पापण्या नेहमीच भिजवत असतो... दोन वेळच्या पोटाच्या भाकरीला..... व्यापारी ही नरडी घोटतो मोल नाही कष्टाच्या किमतीला.... कुटुंबांचे भार मोठे त्याच्या नेहमीच उरीला.... का करू देता आत्महत्या त्या शेतकर्याला ...... योग्य ते मोल न मिळता, हारुन बसतो जिवाला.. व्याजाची ही भीती नेहमीच पाडते कीर झोपडीला... त्या ओझा च्या सुटकेसाठी घेतो घुट ज़हर प्याली चा.. कधीही संपणार नाही त्याची, मातीशी असलेली प्रेम कथा... का करू देता आत्महत्या त्या शेतकर्याला...... नेहमी आपुल्या मुलाला सांगतो शेतकरी होऊ नको बाळा... मुलाचे तसेच उत्तर येते, मी बांधेल शेतकर्याची शाळा... शिकवेल त्यांना नवीन तंत्रज्ञान, बदलेल त्यांची जिवनमाला. नवीन जगाचा नवीन शेतकरी, आता ना करेल आत्महत्या.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आत्महत्या... #आत्महत्या1 हा विषय Hemangi& Ayushi manchekar यांचा आहे #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.