जर शब्द सहजपणे सुचले असते तर प्रत्येकाने आपले दुःख शब्दात मांडले असते मग कदाचित अश्रूंचे मोल समजले नसते जर शब्द सहजपणे सुचले असते तर प्रत्येकांनी भावना शब्दात गुंफल्या असत्या आणि कवी मनाच्या ठिणग्या उडल्या असत्या जर शब्द सहजपणे सुचले असते तर लेखणीचे महत्व कोणालाच कळले नसते आणि विचारांचे वादळ मनात कधीच उठले नसते शुभ संध्या मित्रहो Collab करा जर शब्द सहजपणे सुचले असते तर काय झाले असते, मी नक्कीच कांदबरी प्रकाशित केली असती हा झाला गमतीचा भाग,तुम्ही पण collab करा आणि आम्हाला कळवा आणि हो लिहत राहा. #collab #yqtaai #जरशब्द चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai