बऱ्याच दिवसांनी काल मामाकडे निघालो. दोन तासाचा प्रवास, वर्षभर जाणं होत नाही. तसही मामा मामीला काहीही प्रेम राहिलेलं नाही. आजीसाठी जावं लागतं. म्हातारी गेली, तर मग तेही बंद... संध्याकाळी गेलो, गावात शिरलो, पेठेत आलो. रात्र झालेली, भरपूर पाऊस.... कलूआजीचं दार उघडं दिसलं... कलूआजीचं दार उघडं बघूनच आनंद झाला. कलूआजी म्हणजे एका अतिशय मोठ्या घराचा शेवटचा खांब. तसं बघायला गेलं, तर कलूआजी आणि माझं काहीही नातं नव्हतं, पण काही जिव्हाळ्याची नाती फार मोठी असतात. चार पिढ्यांपासून संबंध... आताच्या पिढीत घट्ट नसले, तरीही तुटले तरी नव्हते. ©Babu Banarasi #भयकथा