आमचा बळीराजा जरा सुस्तवलेला दिवाळीच्या दिपकात विझलेला... गोड धोड बनवलेला अर्धवट बनववेला लाडु... पावसाणी चिंब भिजवलेला दिवाळीचा दिवा गारठला... आनंदाची लहर झगमगली वणव्यात पेटलेला जसा ज्वाला. दुरून दिसणारा काजवा ईवल्याश्या घरासमोर मांडला सडा.. विकत कश्याला जणु लक्ष्मी अवतरली दाराशी, शेणांनी सारवलेली निसर्ग दिवाळी भेटण्या आली.... आस लागुन असते रंगीबेरींगी दिवसाची... सण उत्सवांची आस खरी बळीराज्याशी... दिपक पेटवला त्या खरा सर्जा-राज्याला हाकेला धावणारे पोरंज जणु.. पायांशी ऋणी त्यांच्या एक दिपक लावु.... सजवलेल गरीब घरटं जसं हारफुलांनी रंगवलेलं, नको अजुन काही त्याला लेणं.... एक खरा अनोखा वाडा नटलेला लक्ष्मींच्या पाऊलांनी सडा मांडला.. तिरक्या पुष्पफुलांनी जणु माझ्या राज्याचा राजवाडा सजला.. पैश्यापरी खरा आनंद झगमगला दुखा्च्या अश्रु परी आनंदाची दिवाळी साजली किंमत खरी अन्नदात्याला... काय सांगु अजुन त्याचा महिमा... मी शेतकरी पोरगा ....🙏🙏 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा... आजचा दिवस म्हणजे ‘नरकचतुर्दशीचा’. बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस. नरकासुर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला ‘नरकचतुर्दशी’ असे नाव पडले असा पुराणांमध्ये उल्लेख आहे. कोकणातल्या ग्रामीण भागात या दिवशी नवीन भातापासून तयार केलेल्या पोह्य़ांचे विविध पदार्थ बनवण्याचा रिवाज आहे. तर शहरात फराळाच्या विविध प्रकारात झाले. शहरात या दिवशी सुगंधी उटणे, सुवासाचा साबण लावून आंघोळ करतात. देवळात जाऊन देवदर्शन करून आल्यावर एकत्र बसून फराळ करतात. हा दिवस येणाऱ्या व जाणाऱ्या विक्रमसंवताचा संधीकालातला दिवस. सरते वर्ष भरभराटीचं, समृद्धीचं गेलं त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याची कृषीसंस्कृतीची ही प्रथा होती. मग आजचं कोलँब आपल्या बळीराजासाठी म्हणजेच शेतकरीराजासाठी. #शेतकरी२ टँग करायला विसरु नका. आणि मनातलं लिहा.