#उरलेला प्रश्न रक्ताला वासनांचा संसर्ग झालाय मग बंडखोरी कुठून येणार... बोटे किपॅडवर बधीर झालीत मग वाट दाखवणारे कुठे मिळणार.. धर्माच्या भिंतीच रोवल्यात इथे मग समतेचे रस्ते कुठून जाणार.. "जात" आजही जात नाही मनातुन मग जातीचे बळी कसे रोखणार... प्रेमाचे चिरले जातात गळे मग बंधुतेचे बीज कुठल्या गर्भात उगवणार ... नेत्याचा गुलामीला बांधली ही जनता मग व्यवस्थेची बांडगूळ कोण कापणार... प्रश्न रोजच जन्मतात मग प्रश्नांना वाचा फोडणारा कधी जन्मणार....?? - सरकटे मिलिंद मुरलीधर #उरलेला प्रश्न