Nojoto: Largest Storytelling Platform
ankitwagh7044
  • 3Stories
  • 5Followers
  • 411Love
    5.6KViews

ankit

  • Popular
  • Latest
  • Video
59f6ff49e3157c79395c8983af9ba1fd

ankit

प्रेमाची सगळ्यात मोठी परिक्षा ही तुम्ही ते किती वेळ थांबवून ठेवता ही नसून किती चांगल्या प्रकारे सोडून देतात ही आहे. तुम्ही सोडून दिले म्हणजे तुम्ही प्रेम करत नव्हता असं नाही, तर तुम्ही इतकं प्रेम केलं की तुम्हाला तुमच्या दुःखापेक्षा समोरच्याचा आनंद जास्त महत्त्वाचा आहे. याचा अर्थ असा की, प्रेम हे प्रत्येक वेळी शेवटपर्यंत राहील असं नाही तर आपल्याला काही शिकवून निघून जाईल, ही गोष्ट समजून घेणे होय. 

मला माहिती आहे, बोलायला जितकं सोपं आहे तितकं करायला नाही आहे, जर आपण अडकून पडलेलो असताना समोरचा निघून जातो त्याचही दुःख होतं, ज्याला आपण कायमचं समजलं ते तात्पुरतं होतं हे स्विकारणंही अवघड असतं पण जितक्या लवकर तुम्ही सत्य स्विकारणार, तितकं लवकर तुम्ही यातून बाहेर पडशाल.

जाता जाता एवढंच सांगेन की, एखाद्यावर प्रेम करणं खूप सुंदर गोष्ट आहे, त्यांना गमावणे हिदेखील खूप त्रासदायक गोष्ट आहे, पण ते मनाने निघून गेलेले असताना त्यांना थांबवून ठेवणे हा तुम्ही तुमच्या स्वतःवर व‌ समोरील व्यक्तीवर केलेला सर्वात मोठा अन्याय आहे.

त्यांना आदरपूर्वक जाऊ द्या. तुम्हाला रडायचंय, रडा. ओरडायचंय, ओरडा, पण हे सगळं होत असताना स्वतःला हरवू देऊ नका. कारण जेव्हा भविष्यात कधी तुम्ही मागे वळून पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, जे तुमच्यासाठी व समोरच्या व्यक्तीसाठीही योग्य होतं, तेच झालं.

आणि हेच प्रेम आहे, हाच त्याग आहे, आणि हाच नात्यातील अवघड पण सर्वात पवित्र भाग आहे. बाकी एखाद्या गोष्टीचा जर राग आला असेल तर त्यावर विचार करा, कारण सत्य हे कटूच असतं.

@Ankit_19

©ankit #Thinking  शुभ विचार

#Thinking शुभ विचार

59f6ff49e3157c79395c8983af9ba1fd

ankit

प्रेम म्हणजे स्वार्थ नाही.

आपली नेहमीच प्रेम आणि संलग्नकता (attachment) ह्या दोन गोष्टींमध्ये गफलत होते. आपण विचार करतो की, प्रेम म्हणजे कधीच सोडून न जाणे किंवा जाऊन न देणे. पण माझ्या मते, पुढच्या माणसाचा आनंद कशात आहे हे समजून घेणे आणि त्याचा आनंद मिळवून देणे (भले मग तो तुमच्यापासून वेगळं होण्यात का असेना) हेच प्रेम आहे. असं नाही की, मी अशा चुका केल्या नाहीत, पण जेव्हा भरपूर वाचन केलं, गोष्टी बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सगळ्या गोष्टी लक्षात आल्या, तेव्हा श्रीकृष्णाने राधेवर केलेलं प्रेम समजलं, मीरेचं श्रीकृष्णावरील प्रेम समजलं, अशे अनेक उदाहरणे आहेत, त्याचाच सारांश ‌तुम्हाला सांगतो आहे.

हिच ती परिस्थिती असते, जिथे अनेक जण खुप संघर्ष करतात. त्यांच म्हणनं असतं की, मी तर माझ्याकडून शक्य सर्व काही केले, समोरील व्यक्ती इतका सहज कसा सगळं विसरू शकतो? मी एकटाच का त्रास सहन करतोय? पण प्रेम म्हणजे करार नाही हेच खरं आहे. तुम्ही करता म्हणून समोरच्या व्यक्तीनेही आयुष्यभर तुमच्यावर प्रेम करावे असं तर बंधन नाही आहे. लोक बदलतात, भावना नष्ट होतात, प्राधान्यक्रम बदलतो, आणि कधी कधी तुम्ही कितीही प्रयत्न करा, एखाद्याच्या आयुष्यात तुमचं स्थान नसतं किंवा ठराविक वेळेपर्यंतच असतं.
पण ठीक आहे, ह्यालाच तर आयुष्य म्हणतात.

(Next Page....).

©ankit #Thinking  'अच्छे विचार'

#Thinking 'अच्छे विचार'

59f6ff49e3157c79395c8983af9ba1fd

ankit

Relationship - Part II
 
नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज खुप दिवसांनी लेख लिहिण्याचा योग आला. माझा जुना Relationship नावाचा एक लेख आहे, त्याचाच एक भाग पण एक वेगळा अनुभव आज तुमच्या समोर मांडत आहे. माझ्या मते, फक्त एकत्र राहणं म्हणजे प्रेम नसतं, तर समजून घेणे, एकमेकांना मदत करणे, आणि वेळ पडली तर समोरच्या व्यक्तीला कायमचं जाऊन देणे पण प्रेमच असतं. आपल्याला नेहमी असं वाटतं की, काहीही झालं तरी सोबत राहणं म्हणजेच प्रेम आहे, पण ही गोष्ट खरी आहे की ती फक्त आपली सत्य न स्विकारण्याची अकार्यक्षमता आहे?

आत्ता काही दिवसांपूर्वी माझ्या Roads to Renewal ह्या उपक्रमात मी एका मुलासोबत बोलताना, एक गोष्ट जाणवली. तो मुलगा एकटेपणामुळे त्रासला होता आणि त्याने एका मुलीवर केलेल्या प्रेमातून पुढे निघत नव्हता. त्याने मला एक प्रश्न विचारला की, जर पुढील व्यक्तीचे माझ्यावर प्रेम होते तर मग नंतर त्याने मला का सोडले? मी त्याला इतकचं समजावलं की, जर कोणी तुझ्याशिवाय आनंदी राहत असेल तर तुला त्या व्यक्तीला धरून ठेवण्याचा काय अधिकार आहे? बाकी जे झालं त्याचा विचार करत राहण्यात काही अर्थ नाही.
 
माझ्या मते, प्रेमाबद्दल सगळ्यात मोठं सत्य हे आहे की, जर तुमच्या असण्याने समोरच्या व्यक्तीला आनंद होत नसेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातुन बाजूला होणं हीच त्याच्यासाठी फार मोठी भेट आहे. प्रेम म्हणजे एखाद्यावर तुमच्यासोबत राहण्यासाठी दबाव आणने नाही तर त्यांच आयुष्य आपल्याशिवाय सुकर होत असेल तर त्यांना मोकळं सोडून देणं हे आहे. हे खरं आहे की, हे सर्व करताना दुःख होईल पण फक्त अपराधीपणाची भावना, कर्तव्य किंवा दया अशा गोष्टींचा वापर करून त्यांना बांधून ठेवणे, त्या दुःखापेक्षा वाईट नाही का?

(Next Page.....)

©ankit #Thinking  अनमोल विचार  अनमोल विचार  अनमोल विचार

#Thinking अनमोल विचार अनमोल विचार अनमोल विचार

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile