Find the Latest Status about कावरे ची आणि सापाची गोष्ट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कावरे ची आणि सापाची गोष्ट.
Santosh Jangam
White "विचार - शक्ती" सद्विचारांची ज्योत, पेटवा मनी, ध्येय धरावं, विशाल आसमानी। कर्तव्य पथ हा, घेईल आकार, ध्यास जीवनाचा, यशस्वी साकार॥ उत्तम विचारचं, ठसवा मनी, आचरणात यावा, ध्यान लावुनी। पुस्तकी ज्ञान मग मागे टाकुनी, हाच खरा बोध, तुंम्ही घ्या जाणुनी॥ पराजय ही, विजयाची जननी, हीच ती सुंदरता, सुखी जीवनी। नित्य निरंतर, करावं सत्कर्म, हीन जे संस्कार, न होई विस्तीर्ण॥ ज्योती सम असावी, विचारा धारा, कर्मचं वाही, शक्तीचा स्रोत सारा। जीवनी सकारात्मक, बिज पेरा, सुखद भविष्य, येईल आकारा।। बालमनी पेरा, सुविचार बिज, आत्मबळ करी, विश्वासाचं चीज। जीवनाच लक्ष, दिसे नजरेत, आयुष्य सफलता, येई कवेत।। निराश हृदय, विचारा अडसर, प्रकाशित मन, दावी अवसर। सुविचार मग, करतीलं संचार, आत्मसम्मानास, येईलं उभार।। विघ्न येता वाटेस, रहावे शांत, आशा ज्योत उजळी, मनी निवांत। मिळेलं शुद्ध, विचारास एकांत, समृद्ध पथ हा, दृष्टीस साक्षात।। शरीर हे, विचार प्रकट रूप, राष्ट्र हेचं जन-मनाचे स्वरूप। शुद्धता, सद्विचारांची अभिव्यक्ती,जीवनातं नसावी, निराशा चित्ती।। करूया विचार, साम्राज्य निर्माण, धरूया उंच, आशात्मक निशाण। गाठूया स्वप्न ही, प्रयत्न पंखानी, जगूया जीवन, आनंदी-सन्मानी।। ©Santosh Jangam #कविता : सकारात्मक विचारांनी यश मिळवा, चुकांपासून शिका, चांगले कर्म करा आणि आत्मविश्वास बाळगा. अशा विचारांनी स्वतः आणि राष्ट्र उन्नती करा.
#कविता : सकारात्मक विचारांनी यश मिळवा, चुकांपासून शिका, चांगले कर्म करा आणि आत्मविश्वास बाळगा. अशा विचारांनी स्वतः आणि राष्ट्र उन्नती करा. #मराठीकविता
read moreGovind
*सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि सामान्य माणसाच्या मनातील प्रश्न तसेच प्रामाणिक कार्यकर्त्याची व्यथा इथे मराठी कलाकार आणि कवी सं #जीवनअनुभव
read moreSantosh Jangam
#shrirammandir कविता "राम नवमी उत्सव : परळी" कवितेचे सार म्हणजे राम नवमी उत्सव हा उत्साह, एकता आणि आनंदाने साजरा करणे आहे. त्याच्यात भक्तिचा #मराठीकविता
read moreSantosh Jangam
#HappyMusic कविता "चैत्र नववर्ष: उत्कर्ष प्रारंभ"गुढी पाडव्याचा सार हे नवीन सुरवात, चांगुलपणाचा विजय, आणि सत्याच्या मार्गावर चालणं असतं. हे #मराठीकविता
read moreSantosh Jangam
#tumharesaath मराठी गझल "मनस्वप्न" प्रेमाची खोलवर जळणारी ज्योत आणि विरहाची वेदना हे या गझलेचे सार आहे. प्रेमाची आठवण आणि भेटीची आस असलेली व #मराठीशायरी
read moreKrishna
स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर, Replace मला करशील का.! आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात, स्वप्नपरी म्हणून अवतरशील का ! ©Krishna #स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर, Replace मला करशील का.! आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात, स्वप्नपरी म्हणून अवतरशील का !
#स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर, Replace मला करशील का.! आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात, स्वप्नपरी म्हणून अवतरशील का !
read moreSantosh Jangam
#"आशेची किरण" या कवितेतून आपल्याला कविची आशा प्रतिबिंबित करते. त्यामध्ये स्वप्न, उत्साह, आणि आकांक्षांचे चित्रण केलेले आहे. त्यामध्ये जीवनाच #मराठीशायरी
read moreSangeeta Kalbhor
बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात... हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात... काही काही देणेघेणे नसताना... येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो... शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू... आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा.. एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन... सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी... तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार? निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल... " बसं...की अजून काही' ' अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते.. शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो.. स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो... हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे... मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची... जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल... मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला... अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने.. काय अधिकार असतो आपला आपल्यावर... नक्कीच नाही... जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे... कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे... व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा..... जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय.... कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल... आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा मी उतरंडीच्या पहिल्या गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले... मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी... आता ना कुठला विचार ना कुठली भावना... आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास..... बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी..... गढलेली...दडलेली आणि वेढलेली..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा