Find the Best घेऊन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about घेऊन या हातात हात, मला घेऊन चला, चला मला घेऊन चला, कोणत्याही 3 संख्या घेऊन, निघालो घेऊन दत्ताची पालखी mp3 song,
PRINCE PAWAR
नमस्कार कलाकार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वाना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻 खरंतर कला क्षेत्र अर्थात सिने क्षेत्र हे आकर्षणाचं केंद्र बिंदू आहे म्हटल तरी वावगं किंवा अतिशोक्ती ठरणाचं नाही, वर्षानुवर्षे मुंबईत या क्षेत्रात वावरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जानविली की जेवढी कलाकार मंडळी कामं मिळविण्यासाठी धडपड करत असतात, तेवढीच एव्हाना त्याही पेक्षा जास्त धडपड सिने निर्मिती करणाऱ्या निर्माता किंवा दिग्दर्शकांना करावी लागते, अश्यातच जास्तीत जास्त दर्जेदार हिंदी,मराठी चित्रपट निर्मिती संस्
Gaurav Dalvi
मावळे फक्त शिवाजी महाराजांचे...🚩🚩 l राजाचा ध्यास जंजिरा l l घेऊन साध निघाला मावळा लढायला l l अभेद्य च्या भक्कम बुरुजावर भगवा फडकावायला l l मराठा मर्द छातीचा भंडारा लावला माथ्याला l l पाटीवर हात शिव विचारांचा करून नमन शंभु राजाला l l गनिमी कावा ठेवून रक्तात शिरतो शत्रूच्या जबड्यात l l गद्दारीचा आळ शिरावर फितुरीचा डाग l l बदनामीच्या उसळत्या आगीत जाळतो स्वतःचा अभिमान l l स्वामीनिष्ठेच्या त्या कठोर दुबळ्या मनाची करतो तयारी l l काबीज करण्या जंजिरा घेऊन कल्पना शंभुची l l उतरला पराक्रमी योद्धा करण्यास सिद्धीला उध्वस्त l l सुगावा लागू न गावला लांडग्यांच्या कळपात l l दिव्य ते करून शौर्य गर्जला तो नडला गुर्म्मित l l हरला तो फसला मावळतीचा सूर्य दिसला l l वक्त त्याचा संपला सिद्दीने मस्तानीशी छाटला l l अखंड जंजिरा हादरला दगडाचा देह स्वराज्यासाठी मेला l l अखेरीस मावळ्यातून मावळून गेला कोंडाजी बाबा वीर योद्धा l l अखेरीस मावळ्यातून मावळून गेला कोंडाजी बाबा वीर योद्धा l मावळे फक्त शिवाजी महाराजांचे...🚩🚩
Amruta jadhav
नात्यात थोडी वादळे गरजेची असतात कारण जेव्हा वादळ येते तेव्हा ते आपल्या सोबत चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी घेऊन जातं आणि समाप्त होताना वाईट गोष्टी फेकून देतं आणि ते वादळ हि संपून जाते तसेच नात्यात वादळ येते आणि वाईट गोष्टी घेऊन जाते. आयुष्याला जशी सुखाची गरज आहे तसेच दु:खाची हि आहे शुभ सकाळ 😊
vaibhav padmakar Dharmadhikari
तू मुक्त आहेस.... भावनांचं गाठोडं घेऊन जातांना कधी थकली तर विसावा घे त्या आठवणींच्या झुल्यावर बघ मन शांत होईल.... दुरावलेल्या वाटा शोधतांना होतेच दमछाक तर कधी येतं नैराश्य तेंव्हा तो अस्ताला गेलेला सूर्य बघ उद्या उगवण्यासाठी बुडालेला क्षणात दूर होईल ते मळभ अन पेटशील तू नव्याने त्या निरागस पण संपण्यासाठी पेटलेल्या दिव्यासारखं... सुखाला शोधावं वाटलंच कधी तर तो नभात हरवलेला चंद्र बघ म्हणजे तुला तुझ्या दुःखाची खंत वाटणार नाही .... तू मुक्त आहेस त्या हरणी सारखी चपळ अन चाणाक्ष सुद्धा तेंव्हा विसावा घेऊन उठली ना तर उधळू दे तुझ्या भावनांचे वारू चौफेर अन घुमूदे तो जल्लोष जो तुला बंधनात ठेऊ पाहत होता.... वैभव धर्माधिकारी
Pallavi Phadnis
*त्या आभाळाला निरोप* त्या आभाळाला द्या माझे निरोप त्याच्यावर आज खूप झालेयत आरोप किती वाट पाहायची त्याने भरून यायची वाट पाहायची घराच्या दारात , आत्ता येईल आणि गर्द ओल्या मिठीत घेईल मी आपले सावरुन बसायचे आणि ह्याने मात्र मयसभाच उभी करायची मग जरा बागेत जावून ,फुलांवर मोती साठलेत का पाहायचे ,आणि ह्याने मात्र आत्ता येतो सांगून गरगर फिरायचे ह्याला फक्त एक निमित्त असते,यायचे म्हणून गडगडाट करतो,आधी पाठवतो वाऱ्याला आणि त्याच्याशीच भांडतो ह्यात मात्र हे लबाड आभाळ हळूच घर सोडते आणि हळूच पुढे निघून जाते ह्याला कुठे माहितेय ,हे आभाळ दिसले की सगळ्या सृष्टीला येते भरून ,तो चातक बसतो शाखेवर,आणि मयूर फिरतो रानभर, छोट्या छोट्या पाखरांची घरट्यात परतण्याची घाई , पदर सावरुन बसलेलीअसते वनराई , सगळ्यांच्या डोळ्यांची होतात निरांजने, ह्याचे मात्र आगंतुक येणे ह्याच्या खेळात सगळेच सामवतात, आमच्यासारखे ही लेखणी घेऊन कल्पनेत रमतात, किती त्याचे लडिवाळ चालतात चाळे ,सगळीकडे सृष्टीच्या डोहाळपणाचे सोहळे आता ह्या आभाळाला आणखी एक प्रेमळ निरोप , येशील तेंव्हा सुख घेऊन ये नाहीतर तुझ्यावर होतील सावत्रपणाचे आरोप तुझे नी धरतीचे नाते अनोखे आम्ही का ठेवावे तुझे लेखेजोखे तू कधी हि ये पण येताना अनुरागी आनंद घेऊन ये ,तुझ्या भरल्या कृष्णशितल ,शाश्वत मिठीत मला अलगद गोजांरुन सामावून घे पल्लवी फडणीस,भोर✍
R.K.
झाडांची जंगले कापून सिमेंटचे जंगल उभे करणे म्हणजे विकास असेल तर असा विकास नको आम्हाला, कारण आम्हाला नैसर्गिक हवा घेऊन जगायचे आहे नाही की पाठीवर प्राणवायूचे सिलेंडर घेऊन। -R.K. #जंगल #प्राणवायू
Er. Govinda Polad
एक दंगल अफरातफरी भडव्यांच्या जात मस्तकावर सारख्याच रंगाचा तरी साल्यांच्या रक्तपात मस्तकावर शेवटी वादात पुढाऱ्यांच्या बेजात भिकारी मेला भीमराय बोलले कोणी कुणाच्या शिवराय मस्तकावर स्वराज्यस्तंभ घेऊन घर संविधानाचे बांधले कुणी तरी घडतांना दिसले विचारांचे अपघात मस्तकावर पाशानी बाजार मांडणारे ईथे फिरतात खुले हरामी पानसरे-दाभोळकर मारल्याचे घेऊन आरोप मस्तकावर काळजात या दरिद्रीनच्या राष्ट्रभक्ती जागते तेव्हा जेव्हा होतात शहिदांच्या आघात मस्तकावर लोकशाहीचीही आता यांनी व्यवस्था बरबाद केली मतदान होतं आहे जातीची पाहून कात मस्तकावर - गोविंद अनिल पोलाड ( विद्रोही कवी विचारमंच)
vijay jagtap
सगळ्या परिवाराला घेऊन पोटी, जमवावी लागेल त्यांना आयुष्याची रोटी, जेव्हा तुमची माणुसकी असेल मोठी, आयुष्यभर राहील तुमचे नाव ओठी 😊 मदत करताना एकच ठेवा भान, दुखला नाही पाहिजे कोणाचा स्वाभिमान, माणुसकीच्या नात्याने वाढवा सगळ्यांचा मान, पण स्वतःच्या नावाचा गजर करून नका घालवू माणुसकीची शान...😑🙏 पूरग्रस्तांना देऊया सगळेजण हमी, काहीही पडू देणार नाही त्यांना आपण कमी, ज्यांनी पुढाकार घेतला पुढे व्हा तुम्ही, सतत मदतीचे हात घेऊन सोबत आहोत आम्ही...🙏 सगळ्यांची साथ,मदतीचे हात #कोल्हापूर #सांगली #पूरग्रस्त #मदतीचे_हात #VJ #विज #शब्द_लहरी
Mahesh Lokhande
#OpenPoetry असे वाटे आकाशाच्या सागरी पाहता मेघलाटा होडी घेऊन जावे वाटे शोधाया वाटा पृथ्वीपासून चंद्रापर्यंत बांधूया पूल सूर्यावर रंगीबेरंगी पांघरूया शाल वाटे लावू शर्यत या भव्य सागरात तार्यांचे मोती घेऊन येतील हात असे वाटे तारे वेचून काढावी नक्षी वाटे बनावा ब्रह्मांडात फिरणारा पक्षी असे वाटे ध्रुवासोबत खेळाया जावे तारकांसोबत फेर धरूनी गावे नाचावे वाजेचा चाबूक घेऊनी सूर्यरथी बसावे ग्रहतार्यांच्या भेटी घेत दशदिशांत हिंडावे असे वाटे