Nojoto: Largest Storytelling Platform

Best त्याने Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best त्याने Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about त्याने meaning in english, ज्याची होती त्याने नेली, त्याने परिभाषित करो, त्याने प्रेम केलं किंवा, त्याने खाली प्या,

  • 9 Followers
  • 10 Stories
    PopularLatestVideo

Dilip Jain

------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता

read more
------- अनोखे गेट टुगेदर ---------

लेखक--- C.R. . दिलीप जैन 
मो नं 9923101041

*****************************************
आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत
त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता

R.K.

#poem

read more
प्रेम
प्रेम कुणावर करावं,
प्रेम करावं लहान मुलाच्या हसण्यावर,
त्याच्या बोबड्या बोलण्यावर,
प्रेम करावे प्रेयसीच्या लाजण्यावर,
तिच्या रुसून बसण्यावर,
प्रेम करावे गायीच्या वासरावर,
तिच्या निस्वार्थी पणावर,
प्रेम करावे सागरावर,
त्याच्या भव्य दिव्य आकारावर,
प्रेम करावे झाडे वेलींवर,
त्यांनी दिलेल्या दाट सावलीवर,
प्रेम करावे मित्रांवर,
त्यांनी जीवनात दिलेल्या सोबतीवर,
प्रेम करावे आईवर,
तिच्या त्या भोळ्या मायेवर,
प्रेम करावे सैनिकांवर,
त्यांच्या अथक कष्टांवर,
प्रेम करावे आपल्या बापावर,
त्याने केलेल्या काटकसरीवर,
प्रेम करावे दुष्मणावर,
त्याने केलेल्या आघातावर,
प्रेम करावे पक्ष्यांवर,
त्यांनी केलेल्या किलकीलाटावर,
प्रेम करावे देशावर ,
त्याने दिलेल्या ओळखीवर,
प्रेम करावे झाडांवर,
त्याने दिलेल्या फळांवर।
प्रेम करावे फक्त निरागस,
कोणालाही द्वेष होणार नाही असं।
-R.K.

Krishna Rathod

true story read and answer me एक गोष्ट सांगू का एका होतकरू मुलाची एकदा नही का त्या मुलाला सर्व लोकं चिडवत होते सर्व म्हणजे सर्वच व त्याला त्या गोष्टीचा राग देखील यायचा पण तो काहीच करू शकत नव्हता मग एके दिवशी त्याने सर्वांपासून दूर जाण्याचे ठरवले त्यामुळे त्याने वडील,आई,भाऊ,बहीण,मित्र ,सर्व नाती सोडली व दहा वर्श्याने गावी परत आला जेव्हा तो आला तेव्हा त्याच्याजवळ पैसा गाडी यश सर्व होतं पण जेव्हा तो आला तेव्हा त्याच्या सोबत त्याच्या आपलं म्हननार कुणीच नव्हता म्हणजे तो पुर्ण पणे एकटा पडलेला होता आत #कहानी

read more
एक गोष्ट सांगू का एका होतकरू मुलाची एकदा नही का त्या मुलाला सर्व लोकं चिडवत होते सर्व म्हणजे सर्वच व त्याला त्या गोष्टीचा राग देखील यायचा पण तो काहीच करू शकत नव्हता मग एके दिवशी त्याने सर्वांपासून दूर जाण्याचे ठरवले त्यामुळे त्याने वडील,आई,भाऊ,बहीण,मित्र ,सर्व नाती सोडली व दहा वर्श्याने गावी परत आला जेव्हा तो आला तेव्हा त्याच्याजवळ पैसा गाडी यश सर्व होतं पण जेव्हा तो आला तेव्हा त्याच्या सोबत त्याच्या आपलं म्हननार कुणीच नव्हता म्हणजे तो पुर्ण पणे एकटा पडलेला होता आता तो असा विचार करत होता की मी कमावले खूप पण गमावले त्यापेक्षा ही जास्त आता मला एक गोष्ट सांगा त्या व्यक्तीने असे काय गमावले जे पैश्यापेक्षा ही महाग होते true story read and answer me 
एक गोष्ट सांगू का एका होतकरू मुलाची एकदा नही का त्या मुलाला सर्व लोकं चिडवत होते सर्व म्हणजे सर्वच व त्याला त्या गोष्टीचा राग देखील यायचा पण तो काहीच करू शकत नव्हता मग एके दिवशी त्याने सर्वांपासून दूर जाण्याचे ठरवले त्यामुळे त्याने वडील,आई,भाऊ,बहीण,मित्र ,सर्व नाती सोडली व दहा वर्श्याने गावी परत आला जेव्हा तो आला तेव्हा त्याच्याजवळ पैसा गाडी यश सर्व होतं पण जेव्हा तो आला तेव्हा त्याच्या सोबत त्याच्या आपलं म्हननार कुणीच नव्हता म्हणजे तो पुर्ण पणे एकटा पडलेला होता आत

Roshan Sagar

महापूर

read more
मानावेसे तुजला हे कृष्णा
     अन् पंचगंगा
दाखविलीसी माणसाला 
      त्याची जागा....
 
          लयं मातला हा सारा
   माणूस जाती-जातीत वाटला..
      केली असेल त्याने प्रगती
नाही सोडलाविला त्याने जातीचा खटला..

        देवाने माणसाला धर्मात 
             वाटून द्यावे..
       काय तुझी कमाल आज
 साऱ्या जाती धर्माला वाहून न्यावे....

         देवाला न कधी जमले
    ते ना कधी त्याला जमणार..
        तुझ्या पाण्याचा  प्रवाहाने
माणसाने देवाची नाही सैनिकाचे पाय पडावे....

   तुला ह्या पावसाचे तांडव
       करणं गरजेचं होतं..
त्यामुळेच तर जाती-धर्म
    एकत्र तुला करणं  होतं....

       जेव्हा जेव्हा या भूतलावर
  माणसे जातीमध्ये वाटले जातील..
          मला वाटते तेव्हा तेव्हा
 तू त्यांना त्यांची दया दाखवशील ....

कृष्णा माये आज कोल्हापूर
        पाण्यात मात्र आहे..
 बकरी ईद अन् गणपती पूजा
      पण दस्तावले  आहे....

     नको देऊ हे सणासुदीचे
          क्षणीकचं सुख;..
          दे आम्हाला वाटून
     माणुसकीचे सुख असो की दुःख.... महापूर

Raj Birje

read more
*रंग लेखणीचे परिवार* 
*आठवडा  -43*
*विषय - एक स्वप्न*
*नाव - राज बिर्जे* 
*पत्ता-मुंबई*

त्या उंचीवर जाताना
त्याला एकंच ध्यास होतं
पूर्ण व्हावे ते स्वप्न हेच
जे त्याच्या मनात होतं।

कधीकाळी चा उपाशी
आज जेवणार होता
हे लोकांना दिसावं
असं तो करणार होता।

पळता पळता शीण झाला
तरी तो उठणार होता
स्वप्नांकडे जाताना तो
ती पायरी गाठत होता।

मनातले लक्ष विचार
त्याने जाळत नेले
भरारी गाठताना त्याने
माणुसकीचे  पळत नेले।

©विद्रोही

Rutuja Dorwat

read more
हलकेच शहारला ग जीव तिचा, त्याने जेव्हा मोगरा ओंजळीत टाकला
त्याने त्याचा सुगंध ग तिच्या सुगंधात टाकला।
मर्मबंध होते जणू गतजन्मीचे, तो मोगरा घेऊन यायचा
दर वेळेस, न चुकता सुगंध देऊन जायचा।
मग परत जाताना मात्र, अत्तर दे म्हणायचा,
कालच्या सुगंधाचं उत्तर दे म्हणायचा।
मग नाही सुचला शब्द की, रागावणं आलं,
मी पुन्हा तुझ्या दारी येतच नाही असं म्हणणं झालं।
किती किती गोड होता, तो माझा मोगरा
त्याबदल्यात फक्त एक अत्तर मागितलं जरा।
ती लगेच हिरमुसुन जायची, 
अन हळूच नजर वर करून बघायची।
मग तो हलकेच हसायचा
गालावर तिच्या त्याची आठवण ठेवून जायचा।

Govinda Polad

read more
रक्त झटकत वर्दीवरचे जरा देशात पाहिले त्याने 
आसार देशाच्या गर्दीवरचे धर्मवेशात पाहिले त्याने 

ही दंगल कसली जातनारेबाजी मला विचारले त्याने
नक्सलवादी की आतंकवादी शोकात उच्चारले त्याने

मी म्हटले तू सीमेवरती जेव्हा बाहू लढवत होता
तेव्हा मंदीर-मस्जिदचा नारा इथे दंगल घडवत होता 

मंत्रीजंत्री आश्वासनांची तो आठवण काढत होता 
लोकशाहीवर निडर सैनिक आज अश्रू गाळत होता 

तो म्हटला मग शवास माझ्या तिरंग्यात का आणले तुम्ही
जातीवादी असूनही स्वतःला भारतीय का मानले तुम्ही

धर्मनिरपेक्ष गणराज्याचे पाठीवरचे दफ्तर काढले तुम्ही
जातीवादी नाळेपायी माणुसकीचे लक्त्तर फाडले तुम्ही 

मग जाता जाता त्याने संपूर्ण भारतीयांना विनंती केली
सर्वास सुरक्षित जागा देऊन त्याने बेवारस भ्रमंती केली

 
                 - गोविंद अनिल पोलाड

shivraj Mule

read more
आज सकाळ पासून सरी झिम झिम बरसत होती ।
वातावरण पण धुकं धुकं पडल्यागत झालं होतं।
या चीक चीक क ने थोडा चिखल पण घाण केला होता।
अश्या अवस्थेत लोणावळा-पुणे लोकल पण 10-15 मिनिटे उशीरा येत होती
वाट पाहण्या बरोबर गर्दी  वाढत होती।
आणि त्या अश्या गर्दि मध्ये 7-8 वर्षाचा एक मुलगा  भीक मागताना दिसला।
मनात विचार आला की आपण याच थोडं निरीक्षण कराव।
मग तो मुलगा पैसे मागत मागग माझ्या जवळ आला ।
मी बसलेल्या ठिकाणी आणि कुजबुजल्या गत मला पैसे मागू लागला।
त्याचे कपडे जुने फाटलेले, महिन्या भराचा मळ साचलेले,
अंघोळ तर नाहीच केलेली 

आणि माझ्या हाताला हात लावत म्हणाला ।
तो लहान आवाजात म्हणत होता दादा,भैय्या मला थोडे पैसे द्या । खूप भूक लागली  काल रात्री पासून काहीच खाल्लेले नाही ।अश्या शब्दात तो उत्तरला आणि पोटाला हात सतत हात लावतं चालत होता
आणि विचित्र अशे त्याच्या चेहऱ्यावरील हावं भाव दिसू लागले ।
त्याला काही लोक हात दाखवत तर काही जण त्याचावर हात उगारत,
 तर काही जण पुढे जाऊन माग, डोळे मोठे करत । काही जण सुट्टे पैसे देत।
 आणि तो घाबल्यागत पुढे हात पसरवत असे ।
 त्याला कदाचित  लोकांच्या हिसकण्याने स्वतः चोरी केल्यागत वाटत असेल।
 माझं लक्ष त्या मूला कडे वेधल करण बरेच तरुण, वृद्ध, महिला पहिल्या होत्या भीक मागताना आणि मी काही वेळा देत असे तर काही वेळा माने नं नाही म्हणून सांगत असे। 
 अगोदरच माझे निरिक्षण करून झाले होते।
 पैसे मागताच मनात विचार आला की
 आपण त्या मुलाला पैसे न देता काही तरी खाऊ घालूयात । आणि लोकल ला पण अजून 15 मिनिटे वेळ आहे आणि इथं जवळच जात येईल ।
 मी त्याला विचार काय खाशील । तर त्याने उत्तर दिले दादा मी वडापाव खाईल । चल मग आपण दोघे पण खाऊया आणि पैसे नाही देत मी तुला, मग त्यावर त्याने उत्तर दिले,  खायला नको तुमि पैसे द्या,
 खायला नको पैसे द्या । पण मी विचार केला की याच्या सोबतीनं मला खाता येईल आणि त्या च्या बरोबर थोडा वेळ संवाद साधता येईल, त्याची माहिती आनि त्याला थोडं काही तरी सांगण्याचा प्रयत्न करता येईल ।
 पण परत तो मान हलवत नाही नाही म्हणत 
 खायला नको, पैसे द्या म्हणत लहानश्या आवाज उत्तरऊ लागला । आणि पुढे निघू लागला त्यावढ्यात माझ्या फोन ची बेल वाजली आणि मी फोन वर पप्पांन सोबत बोलत काही क्षण व्यस्त झालो आणि तो मुलगा पुढे मागत-मागत निघू लागला। माझे आणि त्याचे बोलने आटपून गेले ।लगेच माझ्या मनामध्ये विचार येऊ लागले हा मुलगा तर आताच बोल ला की भुक लागली आणि आता पैसे द्या म्हणतो का बरं अस।
 त्याला खरंच भूक लागली नसलं, का त्याला फक्त पैसे हवे असतील । का त्या मुलाचा वापर होत असेल एखाद्या दलालाकडून असच काही तरी असावं असं वाटू लागलं । कारण भारतात खूप सारे असे दलाल आहे की जे लहान मूलांचे अपहरण करून सामान्य लोकांचे आर्थिक शोषण करतात। आणि काही जण लहान मुलांचा वापर करून 1एक व 2दोन नंबर चा धंदा, व्यवसाय करतात,
 त्यांना भीक अन्य अशी काही कामे करायला सांगतात 
 जस की दहशतवादयांन प्रमाणे प्रशिक्षण दिले जाते।
या प्रवृत्तीचे लोक भारतात लाखांवरून जास्त आहेत।
अश्या लोकांना सरकारने ताब्यात घेऊन यांचे असे चोरटे व्यवसाय कडकडीत बंद करायला पाहिजेत ।
त्यांच्या वर कठोर कारवाई केली पाहिजे आणि भ्रष्टाचार पण होयला नको । पण हे पहायला आपल्याला फक्त टी.व्ही. मधेच पाहायला बार वाटतं । पण असं जात अस्तित्वात आणलं गेलं तर 2020 ऐवजी आजचं भारत महासत्तेच्या उंबरठ्यावर पोहचेल। APJ कलामांचे स्वप्न पूर्ण पण होईल। पण असं लगेच होणं शक्य नाही ना । कारण इथं ठीक ठिकाणावर आपलं च सत्य या प्रवत्ती चे लोक आहेत । उदा, कब्बडी खेळा प्रमाणे आहेत जस की यशाची रेषाला स्पर्ष करण्याचा  प्रयत्न केला की बाकीचे पाय ओढतात । असो।
नंतर तो मुलगा पुन्हा माझ्या दिशेने येऊ लागला म्हटलं आपण त्याला काही तरि पैसे देऊ । तर तो तश्याच अवस्थेत माझ्याडे आला आणि उत्तरला दादा चला आपण वडापाव जाऊन खाऊया । त्याने घाबरत घाबरत म्हणला ।
लगेच आम्ही दोघेहि जवळच्या वडापाव च्या गाड्यावर गेलोत ।मी चालत चालत विचार करत होतो की हा मुलगा वापस का आला आणि आगोदर नको का म्हटला। नंतर 2 वडापाव मागितले वडापाव विकणारा चेहरा मोडत पाहून विचार करत असाल,
थोडं स्मिथ हास्य करून 2वडापाव दिले। 
 खाताना त्याला विचारल नको का म्हणलास रे मणाला न राहता ते निघून गेल। तर तो उत्तरला आता तर गर्दी आहे अजून कोणी देतील का ते पाहत होतो ।
आणि सफाई वाले व कर्मचारी इथं भीक मागू देत नाहीत ।म्हणून पुढे गेलो। कुठे राहतोस? Spine Road ला एक छोटी झोपडी आहे तिथेच राहतो।
शाळेत का जात नाहीस?. असंच मागत पोट भरत हिंडाव लागत वाट नुघेल तिकडे। आणि मला शाळेत मास्तर नी येऊ दिल नाही, दाखला घेतला नाही।
खरंच अश्या ह्या मुलांना शाळेत प्रवेश दिला पाहिजे किंवा स्वतंत्र शाळा तरी ठीक ठिकाणी काढली पाहिजे। पिंपरी चिंचवड च्या महानगर पालिकेने अशी मोहीम चालू केली आहे ते खरंच उत्तम आहे 
 दुसऱ्या पण महानगर पालिकने हे कार्य पुढे नयला पाहिजे, आदिवासी, अस्थायी अश्या लोकांसाठी शाळा उघडायला पाहिजे म्हणजे सर्वानाच नोकरी ची संधी लाभलं आणि शिक्षण ही पूर्ण होईल ।  करण कायमहित हेच उद्याचे उवा तरुण पिढीचे समर्थक, देश चालवणारे असतील तर।
आईबाबा काय करतात? । बाबांना दिसत नाही आणि आई पण असंच मागते । आईला मदत म्हणून मी पण हेच काम हाती घेतल। उत्तर देत असताना खूप घाबरलेल्या अवस्थेत होता। आणि मला असे प्रश्न पडणं सहाजिकच होत।
रात्री झोप काशी येत असेल त्याला। क्षणांत विचार येऊ लागले। माझा पण वडापाव मी त्याला देऊ केला। खूप भूकेलेल्या अवस्थेत होता तो। तो पण खुउन झाल्यावर म्हणलं, अजून घे तर नको पोट भरलं म्हणे। नंतर जाताना एक छान स्मित हास्य करून मला प्रश्नानाच्या कोड्यात सोडून, आनंदाने त्याच्या मार्गावर गेला। 
✍✍✍ शिव दैवशला आत्माराम मुळे🙏🙏

Parivartan Jagzap

बरसावं प्रश्नांनी एक-एक करून…
शिस्थबद्ध विद्यार्थ्यांसारखं एका line मध्ये यावं…
घाई नसावी, गडबड नसावी…
शांत, संथ जरी असले तरी पार 'आर-पार' जाऊन ढवळणारे असावे....
नाहीच जर त्यांची उत्तरे मिळाली तर मग 
पेटावं त्यांनी उत्तरांसाठी…
करावी आंदोलने,
करावी जाळपोळ,
करावे दंगे,
गचांडी धरावी
आणि नाकी नऊ आणावे उत्तरदायी इसमाला…
#त्याने जरी कलम १४४ लागू केला तर मग आता
घोळका करावा...
गर्दीने यावं…
बरसावं आता मुसळधार ढगफुटी प्रमाणे…
नामोहरम करून सोडावं…
एखाद्या वेड्या पिश्या प्रियकाराप्रमाणे पाठलाग करावा…
अन उध्वस्त करावं #त्याला-स्वतःला...
पण हे करताना प्रश्नांनी स्वतःलाच प्रश्न विचारावा
का..??
कश्यासाठी..?
कारण काय..??
अस्तित्व कश्याच..??
आणि बरेच….
कारण प्रश्नांना उत्तरे असतात आणि जर उत्तरेच नसतील ते प्रश्न नसतात...


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile