खूप काही सांगायचं असतं,खूप काही बोलायचं असतं, पण काही केल्या जमत नाही,मनात नुसतंच साठवलं जातं. खूप काही समजायचं असतं खूप काही समजवायच असतं, शांत वृत्तीने एकमेकांच्या विचारांना जाणून घ्यायचं असतं. आज उद्या करता करता दिवस निघून जातात, एक एक करून मनात विचारांचे भांडार करून जातात. होते मग चिडचिड नुसताच राग वाढत जातो, मनाजोगे होत नसल्याने संताप वाढून उद्रेक भावनांचा होतो. सहनशक्ती संपते जेव्हा मग स्वतःवरच राग निघतो, शांत करायला येता कुणी त्याच्यावरही पारा चढतो. निघून जाते जेव्हा वेळ तेव्हा मग समजून येते, कुठलीही गोष्ट ही ठरलेल्या वेळीच झालेली बरी असते. नमस्कार मित्रानों कसे आहात? आताचा विषय आहे विषय: उद्रेक भावनांचा #उद्रेकभावनांचा हा विषय