प्रश्न मनाचा मनाशी . . यशस्वी प्रेमीयुगलांचे कौतुक करावे तेवढे कमीच शेवटी एक एक पायरी चढून जिंकलाच गढ एकनिष्ठ राहून एकमेकांसोबत , जीवनातील चढ उतार स्वीकारत . . नाहीतर काही जण असेही आहेत जीव तोडला एकासाठी तो कधी आपला झालाच नाही अशी आहे केविलवाणी गत . . शिक्कामोर्तब होईपर्यंत आपल्या नावाचा क्षणात व्यक्ती बदलून जाईल याचा काही भरवसा नाही म्हणून जीव लावताना ओवाळून टाकण्या आधी करावा विचार . . होत नाहीत कामं कुठलीच घोकत राहिल्यावर , आई म्हणते उगाच जिंकून येण्याआधी नको गावात दिंडोरा नको प्रचार . . तुम्हा लोकांची कायमची उपलब्धी बघुन मन येतं कधी कधी भारावून , होऊन हळवं काय अशी शक्कल तुम्ही लोकांनी असेल लढवली . .?? जे आमच्या कल्पनेत आहे , स्वप्नात आहे , जोडीदाराची साथ ती तुम्ही सत्यात कोणत्या कलेने , कोणत्या जादूने घडवली . .?? कोणत्या देवाची भक्ती करता तुम्ही दोघे मिळून ज्याने तुमची रेशीमगाठ बांधली , ते मला सांगाल का ज्या मुळे तुमच्या चेहऱ्यावर दिसतं समाधान टवटवीतपणा. . ?? मला आज सांगाल का या मिळकतीचे गुपित मला मला परवा नाही हवं तर तुम्ही मला बालिश म्हणा. . ©Mohit Jain मिळेल का मला या प्रश्नाचं उत्तर ?? #standout