शेतकरी जगेल तरच देश जगेल, हे जेव्हा प्रत्येकास कळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश घडेल. शेतकरी जो राब राब राबतो,धनधान्य पिकवतो म्हणूनच आपणास अन्न खाण्यास मिळते नि आपण जगतो. शेतकरी देशाचा मान आहे ,स्वतः उपाशी राहतो पण आपले शेत पिकवितो, स्वतः मरतो पण आपले शेत जगवितो. अशा ह्या शेतकऱ्यास एक ना अनेक संकटे असतात, बाजारात शेती बियाणे महाग असतात,तर स्वतः पिकविलेल्या मालास भाव कमी असतो,कधी पावसाचा तडाखा असतो तर कधी होरपळून जाण्याइतका महागाईचा भडका असतो. ह्या सर्व अडचणींवर मात करतो नि धान्य पिकवितो, शेती जगवतो. नसेल जर पैसा तर वेळप्रसंगी कर्जबाजारी ही होतो,पण धान्य पिकविण्या कधी मागे न सरतो. अशा ह्या शेतकऱ्यास योग्य तो न्याय मिळायला हवा,त्याने घाम गाळून पिकविलेल्या धान्यास योग्य तो भाव द्यावा. कर्ज घेऊन पिकविलेल्या धान्यास योग्य भाव न मिळाल्यास आत्महत्या ही करतो, म्हणूनच सरकारने शेतकऱ्यांचा योग्य तो विचार करून कर्ज मुक्ती द्यावी आत्महत्या थांबवावी असे झाले तरच शेतकरी जगेल नि देश जगेल. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शेतकरी जगेल तर देश जगेल... #जगेल #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#जगेल#collab#yqtaai#bestyqmarathiquotes