आस्था थोडे विचारल्यावर आस्था खरी कळाली, नात्यातली कटूता क्षणात मग जळाली! येतो वसंत आहे शिशिरास दोष नाही, पाने तिथे नव्याने येतात जी गळाली! कुरवाळतोच जो तो आल्यावरी सुखाला, ना वाटल्यावरी ती आली तशी पळाली! दिलदार माणसांची होती पिढी निराळी, स्वार्थात ठार आता सारी मने मळाली! माणूस माकडाचा काळानुरूप झाला, कोलीत गावल्यावर पुन्हा तिथे वळाली! जयराम धोंगडे, नांदेड ©Jairam Dhongade #WorldEmojiDay2021