राजं,आज पुन्हा एकदा तुमची गरज वाटतेय या भारतमातेला...... नकळत तुम्हीही हताश झाला असता; पाहुनी आपल्यातल्याच नराधमांना....... त्या जिनपिंग्यानं पाठवलंय एकलंच प्यादं(कोरोना)...... धुमाकूळ घातलाय त्यानं;केलयं दोन येळेच्या झुणकाभाकरीचं वांदं....... पाहताय ना राजं,काय चाललंय आपल्या हिंदुस्तानात..... मंदिर,मरकज,धर्मप्रसाराच्या नादात माणुसकी विसरत चाललीय आपली रयत...... जिनपिंग्या मात्र हसतोय बघुन आपल्या स्वराज्याचा तमाशा..... राजं,लढतोय बाळासाहेबांचा बाळ;होतेय त्याची दुर्दशा...... त्या भुरट्या प्याद्याला पाणी पाजेल आपला महाराष्ट्र...... राजं ,त्या भुरट्या प्याद्याला(कोरोनाला) पाणी पाजेल आपला महाराष्ट्र..... परंतू वाढत चाललेल्या धर्मभेद, जातिभेद, अंधश्रद्धा इत्यादीसारख्या अफजल्याचा कोथळा बाहेर काढण्यासाठी, आपणांस पुन्हा अवतरण्याचे घ्यावे लागतील का कष्ट? सांगा राजं पुन्हा अवतरण्याचे घ्यावे लागतील का कष्ट? -विशाल पंडित सदरील कवितेत केलेल्या शब्दप्रयोगाचा केवळ एक जनजागृती चा प्रयत्न समजावा...याद्वारे कसल्याही प्रकारच्या भावनांना ठेच पोहोचवणे हा उद्देश मुळीच नाही....... आवडली तर नक्कीचreply द्या.....