फरक पडला लई मोठा त्या युगाचा अन ह्या वेळचा... पहाटे गरगरघर आवाज असायचा कानी आता मोबाईल वाजणारा... खळखळते पाणी अन पहाटेचा काकडा ऐकु यायचा... झापाच्या घराला गरमई असायची मोठी देव पुजेचे मंत्र कानी... बदलला युग सारा मोबाईल चा गुरफडा झाला .. सकाळच्या भजनाची जागा मोबाईल नी बळकवली ... मंदिरांचा जागा गारद पडली... सिमेंट चे घर वर आले कौलारूला पाडले.. कोंबड्या गुरे चरत फिराईची रानोमाळी... स्पिकर वाजतोय आता मोठ्यानी कानी... लहान पोरांचा चिवचिवाट व्हायचा सकाळ सकाळी.. मोबाईलच्या नादानी सगळ्यांची दात खिळी बसली... हिंडणाऱ्या पक्ष्यांची कोंडी झाली... गावठी आहारानी सकाळची सुरुवात होत असतं.. आता वेगवेळले निघाले वेडे पेयं... व्यायाम व्हायचा घामोघाम आणि दमछाक व्हायचा.. टि.व्ही वर रमतोय खेळ आता बाहुल्यांचा... पेपरची खबरबात पारावर रमायची चहानी सभा सारी उलगायची... ना कोणी बसतंय आता बोलतयं कोणी.. आईच्या डोक्याचा पदर कधी खाली न पडायचा.. भलं मोठं लाल लेण रंगायच आईच्या कंपाळाला... नवनवीनच वस्त्र निघाले अर्धवट संस्कृतीचे.. शेतविवार पहीला साला गलबलायचा दुपारच्या न्याहारी रमायचा... विसरलेत सारे आता एकमेकांना सगळे पैश्यांमागे वळलेले.. परत नाही येत दिवस कधी माघारी आता फक्त उरल्या संस्कृती काळच्या आठवणी... २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_फ #मराठीकोट्स #collab #yqkavyanand #व्यंजनकोट #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade