तिळगुळ जेव्हा आमचा बांध सुटला तेव्हा संवाद आमचा शांत होता माणसामध्ये मिसळून सुद्धा दाट गर्दीत एकांत होता सुख समृद्धीने जेव्हा भरले या स्वार्थी मनाचे जीवन जीवनात खऱ्या वैभवाचा जाणवला आकांत होता मी जे जे शोधले जगण्यात वगळुनी प्रत्येक माणसाला तो विठ्ठल माझा तेव्हा दडला लोकांत होता तिळासवे मानावे दुःख अन सुख हे गुळासारखे तो मंत्र जीवनाचा कुठे भिनला अंगात होता या जुळवू पुन्हा ती हरवलेली गोड नाती तुमच्या शिवाय साजरा कुठे आमचा संक्रांत होता रचनाकार, ©सुरेश गोविंद पवार #संक्रात