लग्न म्हणजे सुखद सोहळा, भरतो पाहुण्यांचा मेळावा.. दारी घालता मंडप, वाजतो सनई -चौघाडा.. मुलीच्या डोळ्यातून अश्रू येतात भदभादा.. जाणार असते ती सोडून तिच्या घरच्यांना, नविन घरात नवे अस्तित्व शोधायला.. जाते माहेरी सोडून तिची गोड आठवण, म्हणूनच तिला म्हणतात परक्याचं धन.. नविन पणे तिला तिथं करमत नाही, पण असं दाखवून तिला जमत नाही... जाताना जाते फक्त्त आठवणी घेवून, माहेरी आली कि, म्हणतात आली नांदून.. जेव्हा येते तिला माहेरची आठवण, फक्त मनात करते सगळ्यांची साठवण.. नवऱ्यासाठी जाते सर्वांना सोडून, सासरची बोलतात काय आलीस घेवून.. दीरा मध्ये होतो तिला भावाचा भास, पण भाऊ त्रास देयाला नसतो कुठेच आसपास.. खरंच! म्हणूनच असतात का मुली परक्याचं धन.... ©Komal Barge लग्न म्हणजे....